शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

अकोला : अखेर ४०० सिंचन विहीर लाभार्थींना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:23 AM

अकोला : सिंचन विहिरींच्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवलेल्या पातूर तालुक्यातील १५४, बाळापूर तालुक्यातील २४५ शेतकºयांना देयक अदा करा, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाईचा प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे पत्र दोन्ही गटविकास अधिका-यांना दिल्यानंतरच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कक्षातून बाहेर पडले. त्यांच्या ठिय्या आंदोलनाच्या पवित्र्याने दोन्ही तालुक्यांतील जवळपास ४०० शेतक-यांना न्याय मिळाला. 

ठळक मुद्देसेना जिल्हाप्रमुख देशमुख यांचे आंदोलन कारवाईसह दोन दिवसांत देयक मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिंचन विहिरींच्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवलेल्या पातूर तालुक्यातील १५४, बाळापूर तालुक्यातील २४५ शेतक-यांना देयक अदा करा, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाईचा प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे पत्र दोन्ही गटविकास अधिकाºयांना दिल्यानंतरच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कक्षातून बाहेर पडले. त्यांच्या ठिय्या आंदोलनाच्या पवित्र्याने दोन्ही तालुक्यांतील जवळपास ४०० शेतक-यांना न्याय मिळाला. गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देण्यात आली, त्याचवेळी अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकºयांना सिंचन विहीर योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. देयकासाठी चकरा मारणाºया शेतकºयांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी ही समस्या सोडवण्यासाठी १४ मार्च रोजी बैठक बोलावण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती,  रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, दोन्ही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह देशमुख आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या आढावा आणि चर्चेतून त्या लाभार्थींना तातडीने देयक अदा करण्याचे ठरले. आधी ज्या लाभार्थींना देयक अदा झाले, त्या सर्वांना देयक मिळणार आहेत. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील २४५, पातूर तालुक्यातील १५४ शेतकºयांचा समावेश आहे. सोबतच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या लक्ष्यांकापेक्षा अधिक मंजुरी दिलेल्या मात्र, वर्क कोड न मिळालेल्या विहिरींना नियमानुकूल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देणारे तत्कालीन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्तावही दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले. ते पत्र मिळाल्यानंतरच देशमुख यांनी ठिय्या आंदोलन मागे घेत कार्यालयातून बाहेर पडले.  

टॅग्स :Akolaअकोला