शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
4
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
5
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
6
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
7
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
8
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
9
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
10
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
11
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
12
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
13
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
14
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
15
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
16
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
17
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
18
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
19
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
20
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांत यंत्रणांची उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:36 IST

अकोला: मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला.३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

- संतोष येलकर

अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असताना, मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचे वास्तव समोर येत आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना दूर अंतरावरून विहीर-हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ५४३ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला. यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार कृती आराखड्यात प्रस्तावित कामांपैकी ४३९ कामांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांगावांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, ३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असून, पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे!उपाययोजना                             कामेविंधन विहीर                            १०६कूपनलिका                                 ८२खासगी विहिरींचे अधिग्रहण       ३०टँकरद्वारे पाणीपुरवठा              ५५........................................................एकूण                                      २७३२८९ गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार?पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित ५४३ गावांपैकी मार्च अखेरपर्यंत २५५ गावांत २७३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, उर्वरित टंचाईग्रस्त २७९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ८११ कामे केव्हा पूर्ण होणार आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदWaterपाणी