शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांत यंत्रणांची उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:36 IST

अकोला: मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला.३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

- संतोष येलकर

अकोला: तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असताना, मार्च अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण झाली असून, ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचे वास्तव समोर येत आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना दूर अंतरावरून विहीर-हातपंपाचे पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ५४३ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला. पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला. यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावानुसार कृती आराखड्यात प्रस्तावित कामांपैकी ४३९ कामांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांगावांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, ३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची केवळ २७३ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २७९ गावांमध्ये ८११ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असून, पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे!उपाययोजना                             कामेविंधन विहीर                            १०६कूपनलिका                                 ८२खासगी विहिरींचे अधिग्रहण       ३०टँकरद्वारे पाणीपुरवठा              ५५........................................................एकूण                                      २७३२८९ गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार?पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित ५४३ गावांपैकी मार्च अखेरपर्यंत २५५ गावांत २७३ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असली तरी, उर्वरित टंचाईग्रस्त २७९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ८११ कामे केव्हा पूर्ण होणार आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदWaterपाणी