शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

‘एचटीबीटी’ बियाणे कारवाईत होणार कृषी विभागाचा गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:45 IST

एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या पेरणीचे प्रमाण अधिक असल्याने किती शेतकऱ्यांवर कारवाई करावी, या मुद्यावर कृषी विभाग कमालीचा गोंधळात सापडणार असल्याची परिस्थिती आहे.

अकोला : ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांची पेरणी केल्यास कारवाई करण्याचा दबाव कृषी विभागावर वाढत असला, तरी पर्यावरण कायद्यातील तरतुदीनुसार तालुका न्यायालयातच दावे दाखल करावे लागणार आहेत. विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या पेरणीचे प्रमाण अधिक असल्याने किती शेतकऱ्यांवर कारवाई करावी, या मुद्यावर कृषी विभाग कमालीचा गोंधळात सापडणार असल्याची परिस्थिती आहे.केंद्र शासनाच्या (जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी-जीईएसी) यंत्रणेने एचटीबीटी कापूस बियाण्यांना मान्यता दिलेली नाही. विदर्भाच्या चार ते पाच जिल्ह्यांतील शेतकरी त्या बियाण्यांची पेरणी सातत्याने करतात. त्या अप्रमाणित बीटी कापूस बियाण्यांच्या पेरणीतून पर्यावरण संरक्षण कायद्याची पायमल्ली होत आहे, असे सांगत केंद्र शासनाने राज्याला संबंधितांवर कारवाई करण्याचे बजावले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८० मधील तरतुदीनुसार जनुकीय बदल केलेल्या बियाण्यांचा वापर शासनाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. एकदा पेरणी केल्यानंतर बीटी कापूस बियाण्यांचा पुन्हा वापर करता येत नाही. त्याला शासनाची परवानगी नाही. त्या बियाण्याचे उत्पादन, विक्री, वापर झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद पर्यावरण संरक्षण कायद्यात आहे, असेही सांगण्यात येत आहे.- शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी वकिलांची ‘टीम’दरम्यान, याप्रकरणी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. सतीश बोरुळकर यांनी शेतकºयांवर कारवाई झाल्यास त्यांचे दावे लढण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या मतानुसार पर्यावरण कायद्यातील दावे तालुका न्यायालयात चालतात. वन्यजीवांशी संबंधित विषय असेल तरच प्रकरणे जिल्हा न्यायालयात चालतात (सेशन कमिट). त्याचवेळी प्रतिबंधित बियाण्यासंदर्भात कायदा नाही. त्याबाबत शासन निर्णय आहे. कायदा असल्याशिवाय कारवाई करता येत नाही, शासन निर्णयाच्या आधारे कारवाई करता येणार नाही, असेही त्यांचे मत आहे. राज्यात कुठेही कारवाई झाल्यास ते शेतकºयांची बाजू मांडणार आहेत. ज्या भागात लागवड जास्त असेल किंवा कारवाई जास्त असेल, तेथे तालुका न्यायालयात बाजू मांडण्याचीही तयारी त्यांनी केली आहे.- विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पेरणीलगतच्या राज्यातून बीटी कापूस बियाणे असल्याचे सांगत ते अल्पदरात शेतकºयांना दिले जाते. ४५० ग्रॅम बियाणे पाकीट २५० ते ३५० एवढ्या कमी किमतीत ते मिळते. पेरणी केलेल्या बीटी कापसाची सरकी काढून थेट बियाणे तयार केले जाते. हायड्रोक्लोरिक आम्लाच्या प्रक्रियेने त्यावरील तंतू नष्ट केले जातात. बीटी बियाणे अशी नोंद असलेल्या छापील पाकिटात पॅक करून शेतकºयांना देण्यात येते. आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातून या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते.- नमुन्यांची ‘सीआयसीआर’मध्ये तपासणीकृषी विभागाने घेतलेल्या ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे नमुने तपासणीसाठी केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था (सीआयसीआर) नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यासाठी प्रतिनमुना ५०० रुपये कृषी विभागाला खर्च येत आहे. त्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी