शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

कृषी विद्यापीठासह जिल्हय़ातील तळे, जलसंधारण बंधार्‍यात ठणठणाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:15 IST

अकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्‍यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरलाशेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्‍यात ठणठणाटडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ात दोन दिवस पाऊस पडला, पण या पावसात जोर नसल्याने, तात्पुरता पिकांना संजीवनीदायक ठरला असला, तरी शेततळे, सिमेंट नाला बांध, जलसंधारणाच्या बंधार्‍यात ठणठणाट आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तळय़ात तर थेंबही जमा झाला नसल्याने शास्त्रज्ञांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात बर्‍यापैकी पाऊस झाला आहे. पण, अकोला जिल्हय़ात दोन्हीही दिवस झालेला पाऊस हा १५ मि.मी.च्यावर वर नव्हता. हा पाऊस सर्वत्र नसल्याने काही भागात पडलेल्या पावसाची ही आकडेवारी आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात बहुतांश ठिकाणी जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली; परंतु त्यामध्ये पाणीच नसल्याने संरक्षित ओलितही शेतकर्‍यांना करता येत नसल्याची स्थिती आहे. कृषी विद्यापीठाच्या पाणलोट विकास प्रक्षेत्रावर जलसंधारणाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, वॉटर बँक तळे, अशी विविध कामे करण्यात आली आहेत. तसेच विहिरींचा गाळ उपसादेखील करण्यात आला आहे. सन २00४-0५ मध्ये यावर्षीसारखीच स्थिती होती. त्याच पृष्ठभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे. पण, यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने पुन्हा १२ वर्षांपूर्वीचे चित्र उभे झाले आहे. कृषी विद्यापीठातील बंधारे कोरडी आहेत. शिवणी भागाकडून येणार्‍या नाल्याचे खोलीकरण केल्याने गतवर्षी या नाल्यात जलसाठा संकलित झाल्याने, या भागातील भूगर्भ पातळी अडीच मीटरने वाढली होती. या भागातील सर्व विहिरींची जलपातळी वाढली होती. हे पाणी या नाल्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत होते. त्यामुळे रब्बी पिके व बीजोत्पादनाच्या कामात हे पाणी आले होते. तथापि, यावर्षी हा नाला कोरडा आहे. इतर सर्वच ठिकाणच्या नाल्यात पाणी उपलब्ध नसल्याने यावर्षीचे पाण्याचे हे चित्र कृषी विद्यापीठासमोर संकट घेऊन आले आहे. शरद सरोवर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणात गेले आहे; पण इतर दोन तळे आहेत, तेही कोरडीच आहेत.अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाच्या मागे वॉटर बँक तळे निर्माण करण्यात आले आहे. या तळय़ात पाणी साचल्यानंतर ते भूगर्भात जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली असू्न, येथे सबर्मसिबल इलेक्ट्रिक पंप लावण्यात आला आहे. या तळ्यात साचलेले पाणी एटीएमसारखे वापरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी हे तळे पाण्याने गच्च भरले होते. यावर्षी मात्र कोरडे आहे. -