शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत पलायन करून युवतीने फेरले साखरपुड्यावर पाणी

By admin | Updated: February 6, 2015 02:11 IST

आरपीएफने दिले मातापित्यांच्या ताब्यात.

अकोला : चंद्रपूर जिलतील गडचांदूर येथील एका १८ वर्षीय युवतीने साखरपुडा टाळून २३ वर्षीय प्रियकरासोबत पलायन केले खरे; परंतु आपल्या कृत्यामुळे कुटुंबाची नामुष्की होईल, या विचाराने ती बुधवारी रात्री अकोला रेल्वे स्थानकावर उतरली. कुटुंबीयांना खरी परिस्थिती कळू नये, यासाठी तिने आरपीएफ पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. वस्तूस्थिती समोर आल्यानंतर आरपीएफने तिला तिच्या भावाच्या ताब्यात दिले. गडचांदूर येथील एका युवतीचे लग्न जुळले. गुरुवारी तिचा साखरपुडा होणार होता; परंतु नियोजित वरासोबत तिला लग्न करायचे नसल्याने तिने बुधवारी प्रियकरासोबत पलायन केले. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या युवतीच्या मनात अचानक तिच्या कुटुंबीयांच्या नामुष्कीचा विचार चमकला. त्यामुळे ती प्रियकराला न सांगताच बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर उतरली आणि तडक पोलीस ठाणे गाठून स्वत:च्या अपहरणाचा बनाव मांडला. दोन इसम तिचे अपहरण करून नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्याला जाग आली आणि त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत रेल्वे स्टेशनवर उतरले, अशी माहिती तिने सांगितली. दरम्यान, एक युवक ठाण्याच्या जवळपास घिरट्या घालत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला पकडून ठाण्यात आल्यावर त्याने युवतीचा प्रियकर असल्याचे सांगत, आम्ही पळून जात होते, अशी माहिती दिली.