शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

३२ हजारांवर शेतकरी बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:24 AM

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले २३ हजार ८६४ शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाद झाले आहेत.

ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हय़ात १ लाख ९१ हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ!

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात थकबाकीदार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले २३ हजार ८६४ शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाद झाले आहेत.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. त्यानंतर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीच्या अर्जांंमधील माहितीची पडताळणी करण्यात आली, तसेच बँकांकडून थकबाकीदार शेतकर्‍यांचे ‘ऑडिट’ करण्यात आले. जिल्हय़ात थकबाकीदार, कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले एकूण २ लाख २४ हजार ५१ शेतकरी आहेत. त्यापैकी कर्जमाफीच्या अर्जांंची पडताळणी केल्यानंतर जिल्हय़ातील १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. उर्वरित ३२ हजार ८६४ शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आले. अपात्र ठरलेले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभातून बाद झाले आहेत.

७0 शेतकरी कुटुंबांचे कर्ज खाते  आज होणार ‘निल’! अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हय़ातील ७0 शेतकरी कुटुंबांना प्रतीकात्मक कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करून कर्ज खाते ‘निल’ करण्यात येणार आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १ लाख १२ हजार ४0६ आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे ७८ हजार ७८१ असे एकूण १ लाख ९१ हजार १८७ खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांचे ३२ हजार ८६४ खातेदार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

टॅग्स :Farmerशेतकरी