शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कुकडीच्या आवर्तन नियोजनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:40 AM

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात यावर्षी २२ हजार ३४ एमसीएफटी (२२ टीएमसी, ७४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ...

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात यावर्षी २२ हजार ३४ एमसीएफटी (२२ टीएमसी, ७४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल पाच टीएमसी (२१ टक्के) कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक कधी होणार आणि किती आवर्तने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सोडली जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पात २८ हजार ४८ एमसीएफटी (९५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. अशा परिस्थितीत शेतीसाठी तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय कुकडी कालवा सल्लागार समीतीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात शेतीसाठी दोन व एक पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. यंदा कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणात २ हजार ३८२ एमसीएफटी ९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, तर माणिकडोह ४ हजार ७५० एमसीएफटी ४७ टक्के, वडज १ हजार १६४ एमसीएफटी ९९ टक्के, डिंभे १२ हजार ३५६ एमसीएफटी ९९ टक्के, पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ८८७ एमसीएफटी ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. घोड धरणात ४ हजार ८७७ एमसीएफटी १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

यावर्षी माणिकडोह, पिंपळगाव जोगे ही धरणे निम्मीच भरली आहेत. हा चिंतेचा विषय आहे. याचा कुकडीच्या एका आवर्तनावर परिणाम होणार आहे; परंतु सीना, विसापूर धरणे १०० टक्के भरली ही जमेची बाजू आहेत.

कुकडी लाभक्षेत्रातील ज्वारी पाण्याअभावी सुकू लागली आहेत. मात्र, कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यावर अद्याप कोणतीच चर्चा नाही. त्यामुळे ही बैठक तातडीने घेऊन कुकडीची आवर्तनांसंदर्भात एकत्रित निर्णय होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

कोट...

कधी होणार बैठक...

कुकडी लाभक्षेत्रातील पूर्व भागात ज्वारी, कांदा, सूर्यफुल पिके आहेत. या पिकांना पाण्याची आवश्यकता असून, कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक लवकर घेऊन आवर्तन सोडण्याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन आढळगाव येथील शरद जमदाडे यांनी केले.

कोट..

यंदा पाऊस चांगला झाला. आवर्तन सोडा म्हणून कोणीही मागणी केलेली नाही. मात्र, आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी लागेल याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे लवकरच बैठक होईल. त्यामध्ये आवर्तनाचे नियोजन ठरेल.

-हेमंत धुमाळ,

अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्प, पुणे