शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

उसाला पर्याय.. केशर आंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:53 AM

काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते.

भाऊसाहेब येवले

काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते. मुरमाड जमिनीत आंबा पीक केल्यास फायदेशीर शेती करता येईल, याचा अभ्यास गव्हाणे यांनी केला.  तीन एकर मुरमाड जमिनीवर दहा वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली. साडेतीनशे आंब्याची झाडे ऊसपिकाला भारी असल्याचा अनुभव गव्हाणे यांना आला आहे. आंब्याची रोपे १६ बाय १६ फूट या अंतरावर लावली. सुरूवातीला राजेंद्र गव्हाणे यांनी तीन वर्षे आंतरपिके घेतली. आंबा पिकावर कमी खर्च करण्याचे धोरण आखले. त्यानुसार गावरान गायीचे गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ, वडाखालची माती, गूळ यांचे मिश्रण पाण्यामध्ये एकत्र करून स्लरी तयार केली. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आंब्याच्या झाडांना स्लरी देण्यात आली. रसायनिक खते व औषध फवारणीचा खर्च टाळला.  त्यामुळे सेंद्रिय आंबे ग्राहकांच्या पसंतीला उतरले. तिसऱ्या वर्षांपासून आंब्याचे फळ धरण्यास सुरूवात केली. शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने आंब्याची विक्री केली जाते. झाडावरून कै-या उतरल्यानंतर त्या नैसर्गिक पद्धतीने पिकविल्या जातात. त्यानंतर तयार झालेल्या आंब्याची प्रतवारी केली जाते. पिक्यापेक्षा विक्या भारी... या न्यायाने राजेंद्र गव्हाणे हे थेट ग्राहकांना आंब्याची हातविक्री करतात. वळण, मानोरी, कुक्कडवेढे, सोनई, राहुरी, ब्राह्मणी आदी ठिकाणी स्टॉल उभारून आंब्याची विक्री केली जाते. त्यामुळे आंब्याच्या झाडापासून अधिक प्रमाणावर उत्पन्न मिळण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्य वडील भिकाजी गव्हाणे, मुलगा नीलेश, महेश यांची मदत आंबे विक्रीसाठी होते. ग्राहकांना माहीत असल्याने घरी येऊनही ग्राहक आंब्याची खरेदी केली जाते. ६० रुपये किलो या दराने आंब्याची विक्री केली जाते. एका झाडाला २० ते ३० किलो आंबे निघतात. उत्कृ ष्ट प्रतीचे रसायनरहित आंबे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.आंबा पिकाशिवाय राजेंद्र गव्हाणे यांनी टिश्यूकल्चर जी-९ या वाणाची एक एकरावर ६ बाय ५ या अंतरावर लागवड केली आहे. एका एकरात १५०० केळीच्या रोपांची लागवड केली आहे. केळीमध्ये आंतरपीक तूर पीक घेतले आहे. केळी घडाने लगडली आहेत. केळीला ब-यापैकी भाव मिळणार असल्याने उसापेक्षा केळीतून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. डाळिंबाचे चार एकरात १२ बाय १० या अंतरावर भगवा वाणाची लागवड केली आहे. डाळिंबाला बहर आला असून, यंदा चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या शिवाय यांनी गोपालन व्यवसाय केला आहे. जनावरांचे खत शेतीचे उत्पादन वाढविण्यास मदत करीत आहेत. फळबाग लागवड क रताना राजेंद्र गव्हाणे यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरी