शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अण्णांचे मन वळविण्यात राज्य सरकारला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 6:34 PM

अण्णा हजारे - महाजन भेट : आंदोलनाचा निर्णय पक्का; अण्णा दिल्लीकडे रवाना

ठळक मुद्देज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत.बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २३ मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार असून बुधवारी सकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. परंतु अण्णा आपल्या निर्णयावर ठाम असून उद्या नियोजित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.त्रेचाळीस वेळा पत्र पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. परदेश दौ-यात व्यस्त असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या पत्रांना उत्तरे देण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची टीका यावेळी अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. आपण लोकांसाठी आंदोलन करीत आहे. हार्ट अ‍ॅटॅक येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणं चांगलं म्हणून उपोषण करणारच असा निर्धार अण्णा हजारे यांनी केलाय. शेतक-यांच्या शेतमालाला उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा द्यावा, शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांना किमान दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांचा पीक विमा सामूहिक न करता तो वैयक्तिक करावा, १९४९ बँक रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसार पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावू नये, शेतमजुरांना उत्पादन सुरक्षा रोजगाराची हमी द्यावी, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, निवडणूक सुधारणेत उमेदवाराच्या नावापुढे फोटो व चिन्ह काढून फोटोलाच चिन्हाची मान्यता द्यावी, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, सरकारच्या वतीने मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. अण्णा आणि महाजन यांची चर्चा दोन तास चालली, परंतु त्यांना पुन्हा एकदा अण्णांचे मन वळविण्यात अपयश आले. यावेळी महाजन म्हणाले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे, मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत संपर्क चालू आहे. अण्णांच्या सर्व मागण्या या देशहिताच्या असून त्याचा देशातील सर्व जनतेला फायदाच होणार आहे. भेटीनंतर अण्णांच्या प्रमुख मागण्यांचे पत्र घेऊन मुंबईकडे महाजन रवाना झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजनParnerपारनेर