शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 5:18 PM

राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे

अहमदनगर - त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जनतेला शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अपप्रचारला कुणीही बळू पडू नये, असेही ते म्हणाले.

राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत, परंतु तिथल्या हिंसाचाराचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दिसणार नाहीत. इथल्या समता, बंधुतेला कुठलाही धक्का लागणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावीच लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्यात जातीय व धार्मिक सलोखा टिकवण्याचं काम आपणा सर्वांना करायचं आहे. त्यामध्ये, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवायची आहे. अफवा आणि अपप्रचाराला कुणीही बळू पडू नका. राज्यातील तमाम जननेतं संयम बाळगावा, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. 

कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या निधीतून सुरु असलेल्या कामांचं भूमिपूजन आणि उद्धाटन समारंभ आज पार पडला. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांना मिळून तब्बल २३० कोटी रुपयांचा निधी विकासकामांना मिळाला असून त्यातून ही कामे होणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला.

गृहमंत्र्यांनीही केलंय शांततेचं आवाहन

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारTripuraत्रिपुरा