शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:17 PM

रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली.

 राहुरी :  रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राहुरी तहसील कार्यालयामध्ये कापूस उत्पादक शेतकरी  व्यापारी व अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. बैठकीमध्ये रवींद्र मोरे यांनी सांगितले की, वजन काट्यामध्ये रिमोट पद्धतीने शेतकऱ्यांचे कमी वजन दाखविले जाते. याशिवाय रिकामे वाहनाचे वजन काट्यावर वजन करताना माणसाला बसवली जाते. त्यामुळे ७० किलो कापसाला घट दाखविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होते. कोणत्याही कापूस व्यापाऱ्याकडे लायसन नसल्याचे मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

बारा प्रकारचे लायसन आहे. त्यापैकी एक प्रकारचे लायसन तरी व्यापाऱ्यांनी ठेवावे. कोणत्याही शेतकऱ्यांची लूट केल्यास आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शेख यांनी दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आव्हान केले. शेतकरी, व्यापारी, अधिकारी यांच्यात समन्वय असण्याची गरज तनपुरे यांनी व्यक्त केली.

बैठकीस  माजी खासदार प्रसाद तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, बाजार समितीचे प्रकाश डुकरे, वरिष्ठ लिपिक मधुकर कोळसे,   वजन काटा सहाय्यक निबंधक सुनील चित्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, व्यापारी अतुल तनपुरे, सचिन  दुबे, संदीप डावखर, ईश्वर सुराणा आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरcottonकापूसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र