शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:36 PM

पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात.

अहमदनगर - लोकसभा निवडमुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराचा नारळ गावागावात फुटत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ५ उमेदवारांची नावे जाहीर झाली. त्यामध्ये नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथीलम मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे. त्याचसाठी, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रा व प्रचाराचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथे करण्यात आला. यावेळी, बोलताना लंकेंनी नाव न घेता सुजय विखेंवर टीका केली. तसेच, आत्तापर्यंत आपण तुम्हाला मुंबई दाखवली. आता, दिल्ली दाखवणार, असे म्हणत कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासनही दिलं. 

पाथर्डी येथील सभेतून राशप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात. पण त्यापेक्षा त्यांनी दहा वर्षांमध्ये काय केलं हे सांगितलं. कोरोनाची महामारी आली. या महामारीत त्यांनी जनतेला टाळ्या वाजवायला सांगितलं. या महामारीत ५० लाख लोकांचा जीव गेला. त्यावर सरकार बोलत नाही.". तर, आपल्यातून काही सरदार तिकडे गेले. तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीमध्ये सहाव्या रांगेमध्ये स्थान मिळालं, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी गटावर नाव न घेता केली. तर, निलेश लंके यांनीही नाव न घेता सुजय विखेंना लक्ष केले. तसेच, कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासनही दिलं. 

मोहोटादेवीचं दर्शन घेऊन आपण स्वाभीमान जनसंवाद यात्रेची सुरूवात केली असून नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन आपण या यात्रेचा समारोप करणार आहोत, त्यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निलेश लंकेंनी दिली. आपल्या भागातील लोकांचे प्रश्न, मतदारसंघातील वेगेवगळ्या अडचणींची माहिती घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दुष्काळी आणि बेरोजगारी या दोन प्रश्नांवर काम करणार असून तरुणाईच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे निलेश लंकेंनी म्हटले. तसेच, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे आहेत, काम आपण करायचे आणि नारळ त्यांनी फोडायाचा, अस काम चालतं. शेतकऱ्यांना वेढीस धरलं जातं, अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. स्वत: काचेच्या घरात राहतात आणि दुसऱ्याच्या घरावर दगड टाकतात, असे म्हणत विखे पाटलांवर लंकेनी निशाणा साधला. 

हे देवीच्या दारातही आपली जहागिरी दाखवात. पण, आपण देवी मातेचा सच्चा भक्त आहे. देवीचं दर्शन घेतलं, आता डायरेक्ट दिल्ली. तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो दिल्लीला. मला अनेकजण म्हणतात अधिवेशन काळात किती लोकं आणतो रे, २०० ते ४०० लोकं घेऊन जातो मी अधिवेशनाला. आजपर्यंत तुम्हाला कोणी संसद दाखवली का, आता मी सगळा लोंढाच घेऊन जातो दिल्लीला, असे म्हणत लंकेंनी कार्यकर्ते व मतदारांना दिल्लीवारीचे आश्वासन दिलं. तसेच, मी जे बोलतो ते करतो, आणि जे करतो तेच बोलतो. भविष्यात मला संधी दिल्यास प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बेरोजगारी कमी झाली पाहिजे, तरुणांना काम मिळालं पाहिजे, असे लंकेंनी म्हटले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ahmednagar-pcअहमदनगरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sujay Vikheसुजय विखेnilesh lankeनिलेश लंकेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४