शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

...या आमदाराला विखेंचा इशारा; लोकप्रतिनिधी बेताल झाले तर पुन्हा संधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:17 AM

श्रीरामपुरात कोणताही राजकीय कार्यक्रम करायचा झाला तर त्यात विघ्न येणार हे ठरलेले आहे. मात्र प्रत्येक काम हे मला विचारूनच झाले पाहिजे असे जर लोकप्रतिनिधीला वाटत असेल तर कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही. बेताल वागाल तर पुन्हा संधी मिळणार नाही. श्रीरामपूर तालुका हा कोणाचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, अशी टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

श्रीरामपूर : श्रीरामपुरात कोणताही राजकीय कार्यक्रम करायचा झाला तर त्यात विघ्न येणार हे ठरलेले आहे. मात्र प्रत्येक काम हे मला विचारूनच झाले पाहिजे, असे जर लोकप्रतिनिधीला वाटत असेल तर कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही. बेताल वागाल तर पुन्हा संधी मिळणार नाही. श्रीरामपूर तालुका हा कोणाचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा इशारा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिला.

पंचायत समितीच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी विखे बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार सदाशिव लोखंडे, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, शरद नवले, सभापती संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, दीपक पटारे उपस्थित होते.

विखे म्हणाले, येथे प्रत्येक राजकीय कामाला ग्रहण लागते. त्यात काही नवीन नाही. विघ्न हे येतच असतात, त्याशिवाय श्रीरामपुरात कोणतेही काम होत नाही. मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन कामे केली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या पक्षाची भूमिका मांडावी. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र काही कामांमध्ये सहकार्य करण्याचे भान जपले पाहिजे. पंचायत समितीच्या इमारतीच्या रुपाने जर विकासाचे मंदिर उभे राहत असेल तर त्यात राजकारण केले जाऊ नये. भूमिपूजनाला राजकीय वळण दिले गेले. मात्र मंत्री अब्दुल सत्तार हे यावेळी उपस्थित राहिले. त्यामुळे सर्व विरोध मावळला. कार्यक्रमावर बहिष्कार टाकणारे लोक हे आमच्याच मांडवाखालून गेले आहेत. कोणाला काय वाटते याचा मी विचार करत नाही, अशी टीका आमदार विखे यांनी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.

शेती महामंडळाच्या जमीन वाटपात येथे मोठा भ्रष्टाचार झाला. अनेकांनी शहरालगतच्या जमिनी लाटल्या. यात महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक अग्रवाल यांनी गैरव्यवहार केले. त्यांच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी मी विधानसभेत केली. त्यावर अग्रवाल हे पुण्यामध्ये मोठे बांधकाम व्यावसायिक झाले. मात्र पुन्हा त्यांनाच सरकारने प्रशासनामध्ये आणण्याचा घाट घातला आहे. त्यांना सरकारमध्ये घेऊ नये अन्यथा सामान्य जनतेचे हाल होतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण