शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

मिरजगावचा पाणी पुरवठा विस्कळीत! सीना धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 6:21 PM

सीना धरणातील पाणीसाठा खालावल्याने मिरजगाव शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

मिरजगाव : सीना धरणातील पाणीसाठा खालावल्याने मिरजगाव शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ लागल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरसावले आहेत.सीना धरणात मिरजगाव पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरी आहेत. या विहिरींमधून दोन महिन्यापासून पाच दिवसांनी टप्प्या-टप्प्याने चार भागात पाणीपुरवठा केला जातो. दोन आठवड्यांपासून धरणात पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे विहिरीतील पंपाना पाणी कमी पडू लागले. त्यामुळे गावातील पाणी एका भागाला दहा दिवसांनी पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली.सोमवारी सकाळी सरपंच नितीन खेतमाळस, दत्ता तनपुरे तर दुपारी उपसरपंच अमृत लिंगडे पंचायत समितीचे सभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी सरपंच डॉ. आदिनाथ चेडे व ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे यांनी धरण परिसरात पाहणी केली. दोन विहिरीतून दहा अश्वशक्ती पंपाच्या सहाय्याने पाणी पाईपलाईनद्वारे पंपहाऊसमध्ये टाकण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात काम सुरू केले. मंगळवारी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य संपत बावडकर, लहू वतारे, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, निवृत्ती जवणे यांनी या कामाची पाहणी करून येथील कामगारांना मदत केली. दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कल्याण वाकळे, जालिंदर गायकवाड, एकनाथ खोटे, दिगांबर नवले, अशोक रायकर, सोपान राऊत, शिवाजी गायकवाड, मुख्तार सय्यद, विठ्ठल जोगी हे ग्रामपंचायत कर्मचारी आठ दिवसांपासून सातत्याने काम करत आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर