शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

अकोलेतील ममताबाईचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:42 PM

देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.

हेमंत आवारी । अकोले : देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. कोलकत्ता येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात भांगरे यांनी सहभाग नोंदवत सेंद्रिय भात शेती, नैसर्गिक परसबाग शेती, गांडुळ खतनिर्मितीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूमी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या तिन्ही विभागाच्या वतीने कोलकात्ता येथे पाचवा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच पार पडला. संमेलनात ममताबाई भांगरे यांनी दुर्गम आदिवासी भागात फुलवलेल्या सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. दुभाषिकाचे काम बायफचे जितीन साठे यांनी केले. ममताबाई बायफ संस्थेशी ‘जनरल मिल्स’ या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे आल्या. त्यांनी सेंद्रिय शेतीतून भात शेती तर नैसर्गिक शेतीतून परसबाग फुलवली. उत्तम रितीने गांडुळ खत निर्मिती केली आणि गांडुळ खताच्या छोट्या गोळ्या तयार केल्या. दोन रोपांमध्ये या गोळ््या गाडल्या. खत वाहून जाणार नाही, याची काळजी घेतली.  त्यांचे हे संशोधन यशस्वी ठरले. याच पध्दतीने त्यांनी बियाणे गोळा करुन परसबाग रोपवाटिका तयार केली. विविध भाजीपाला पिकांच्या बियांचे संवर्धन त्यांनी केले. तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोलकात्ता येथील विज्ञान महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते.कामाची प्रशंसा बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे यांनीही संमेलनात मार्गदर्शन केले. विज्ञान - तंत्रज्ञान विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ममताबाई यांच्या कामाची प्रशंसा केली. खासदार रूपा गांगुली यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला. लीना बावडेकर, बाळासाहेब मुळे, राम कोतवाल, योगेश नवले, लीला कुºहे, रोहिदास भरीतकर, राम भांगरे यांनी ममताबाईंना प्रोत्साहन दिले.

टॅग्स :AkoleअकोलेFarmerशेतकरी