शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 5:30 PM

बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.

अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशानंतर एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला बंद पाचव्या दिवशी मागे घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच दिवसानंतर एस. टी. बस धावू लागली. दरम्यान बंदच्या काळात महामंडळाच्या नगर विभागाचे तब्बल दोन कोटी ५० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तर जे कर्मचारी संपात सहभागी होते, त्यांची बिनपगारी रजा लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. जिल्ह्यातील ११ आगारांमधील ६५० बसेसला बे्रक लागला होता. त्यामुळे दिवाळीच्या सणाला जाणारे-येणा-या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. तर ग्रामीण भागातील हक्काचे प्रवासी वाहन असलेल्या लालपरीला बे्रक लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले. काही ठिकाणी खासगी वाहनांचा आधार लोकांनी घेतला तर काही ठिकाणी खासगी वाहनेही उपलब्ध नसल्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. संपादरम्यान खासगी वाहतुकीचेही दर वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसली़ एकीकडे प्रवाशांना मोठी झळ सहन करावी लागली असतानाच महामंडळालाही २ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपाच्या काळातील चालक-वाहकांच्या रजा गृहित धरण्यात येणार असून, या रजाही बिनपगारी लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.शनिवारी (दि. २१) पहाटेपासून महामंडळाच्या तारकपूर आगारातून लांबपल्ल्याची गाड्या सोडण्यात आल्या. तर तालुकास्तरावरील आगारातून स्थानिक बसगाड्या सोडण्यात आल्या. बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ