शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 8:01 PM

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.

गणोरे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.मात्र, धरणाच्या लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यांतून यंदाचा पाण्याचा पहिलाच प्रवाह कालव्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी दाबाने सोडण्यात आला आहे. कालव्यांतील अडथळ्यांची भीती असल्याने, रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवास सिंचन यंत्रणेसाठी चिंताजनक असल्याचे समजते. नेहमी पहाटेच्या वेळी पाणी सोडून दिवसभरात पाण्याच्या प्रवाहातील तुंबलेल्या अडथळ्यांना दूर करता येते. मात्र, यंदा अद्याप कालव्यांतील स्वच्छता पुरेशी झालेली नाही. आवर्तन सोडण्याबाबत आजही द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिका-यांनी अखेर दुपारी दोन्ही कालव्यांत प्रत्येकी २० क्युसेकने पाणी सोडले आहे. सोमवार १५ जानेवारीस पहाटे हे आवर्तन जाहीर केल्याप्रमाणे पुरेशा तयारीअभावी सोडताच आले नाही. त्यामुळे उशिराने मंगळवारी दुपारी सोडण्यात आले आहे.

पहिल्यांदाच रब्बीचे आवर्तन एवढे रखडले

रब्बी हंगाम सुरू होऊनही तीन महिने उलटले. नुकतेच कालव्यांमधील गवत व झाडा - झुडपांच्या सफाईचे काम घाईघाईत करण्यात आले आहे. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या उशिरापर्यंत रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन रखडण्याची वेळ आली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात ९७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठ्यातून रब्बी हंगामातील अन्नधान्य, चारापिके,उभ्या भुसार पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले