शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:18 AM

दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल (वय-६०) यांनी आपल्या राहात्या घरी (दि. २४ रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली.

जामखेड : दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल (वय-६०) यांनी आपल्या राहात्या घरी (दि. २४ रोजी) गळफास घेऊन आत्महत्या केली.पंढरीनाथ बागल यांच्याकडे सहकारी बँकेचे एप्रिल २०१६ मध्ये घेतलेले ३७ हजार ७०० रुपये कर्ज आहे. याचे व्याज १४ हजाराच्या आसपास होत आहे. खाजगी सावकाराचेही काही कर्ज होते. दुष्काळ, शेतातील नापिकी व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावग्रस्त होते. २४ जानेवारी रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.पंढरीनाथ बागल यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. यातील एक एकर कांदा लागवड केलेली होती. कांदा पिकाला बाजारात भाव नसल्याने खर्चही निघाला नाही. एक एकर क्षेत्रात ज्वारी आहे. पीक चांगले आले परंतु रानडुकरांच्या उपद्रवाने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. गतवर्षी रानडुकरांनी नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा करून वनविभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. यासाठी खर्च हजार रुपये आला व एक वर्षांनी बाराशे रुपये नुकसानभरपाई मिळाली. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर रानडुकरांनी नुकसान केलेले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड