शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुढील पाच दिवस जिल्हा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 4:19 PM

अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.

राहुरी : अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे़यंदा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता़ मात्र प्रत्यक्षात दोन सव्वादोन महिन्यात पावसाने ठेंगा दाखविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत़ मुळा व भंडारदरा या धरणाशिवाय छोट्या, मोठ्या धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी पावसाने दडी मारली आहे़ याशिवाय जायकवाडीला पाणी जाण्याची भीती शेतकºयांना आहे़ दुसºया बाजूला ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ हवामानावर आधारित विद्यापीठाने शेतकºयांना सल्ला दिला आहे़ लाल बोंडअळी आढळून आल्यास कामगंध सापळे लावण्याचा शेतकºयांना सल्ला देण्यात आला आहे़ तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे मूग व उडीद पिकांवर मावा, तुडतुडे व पांढरी माशी आढळून आल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही अथवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली अथवा मिथील डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ८ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे़सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास १२ मिली ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे़ तूर या पिकावर शेंडे गुंडाळणारी अळी व पाने कुडतडणाºया अळीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४़५ टक्के प्रवाही ७ मिली किंवा स्पीनोसॅड ४५ टक्के प्रवाही तीन मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे़पावसाने ओढ दिल्याने पिके सुकलीबोटा : पावसाने ओढ दिल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर व परिसरातील गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांसह माळरानावर चाराही सुकू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पठारभागात सुरवातीला वळवाचा दमदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे आगमन लांबले. यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाचे ओलीवर बोटा, घारगाव, साकूर व इतर गावांमध्ये शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग आदींसह कडधान्ये या पिकांच्या पेरण्या उरकल्या. सारोळेपठार नांदुर-खंदरमाळ व लगतच्या गावामध्ये लाल सेद्रीय कांदा पिकांच्या पेरण्याही झाल्या.दरम्यान पठारभागातील बहुतांश क्षेत्र हे पावसावरच अवलंबून आहे. त्यातच पावसाने काही दिवसांपासून ओढ दिल्याने साकूर उत्तर भागातील खांबे, वरवंडी, कौठे, मलकापूर, हिवरगाव पठार, रणखांब व लगतच्या गावांमध्ये खरीप पिके सुकू लागली आहेत. माळरानावरील चाराही सुकू लागला आहे.यामुळे या गावांमधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मुळा नदी परिसर व बोटा, घारगाव परिसरातील पिक परिस्थिती समाधानकारक असली तरी येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामावरच परिणाम होण्याची शक्यता आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सीअस राहील़ किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सीअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ८८ ते ९० टक्के राहील़ किमान आर्द्रता ७१ ते ७३ टक्के राहील़ वाºयाचा ताशी वेग १३ ते १६ किलोमीटर राहील़ -रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस