शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 5:03 PM

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. 

गणोरे : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. प्रारंभी उजव्या कालव्यातून ३० व डाव्या कालव्यातून २० क्युसेक दाबाने पाणी सोडले होते. गरजेनुसार पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी  बोलताना सांगितले.  मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांकडून पुरेशा प्रमाणात अधिकृत पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे विभागाकडे जमा झालेले नाहीत. आढळा धरणाची पाणी साठवण क्षमता एक हजार ६० दशलक्ष घनफूट आहे. बुधवारी आवर्तन सोडताना ९९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. चार हजार हेक्टरसाठी पाणी मागणीआढळा धरणाखाली तीन हजार ९१४ हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. मात्र, शेतक-यांकडून फक्त सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याच्या मागणीची अधिकृतपणे नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. गेल्या रब्बी हंगामात धरण अर्धेच भरले असताना शेतक-यांनी एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. यंदा आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाणीदार परिस्थिती आहे. अद्याप शेतक-यांना पाणी टंचाईची चिंता नसल्याने पाण्याच्या मागणीची घाई दिसून येत नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेDamधरणWaterपाणी