शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

वीजबिल माफीसाठी जामखेड महावितरण कार्यालयास ठोकले टाळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 2:43 PM

नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे.

जामखेड : कोरोना साथीच्या या भीषण संकटांच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे, या मागणीसाठी जामखेड येथे आम आदमी पक्षाच्या वतीने विद्युत कार्यालयासमोर आंदोलन करुन टाळे ठोकण्यात आले. 

     कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारकडून सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने जामखेड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक संतोष नवलाखा, जामखेड संयोजक बजरंग सरडे, सुंदर परदेशी, अजय भोसले, गणेश गवसणे, स्वानंद कुलकर्णी, नंदु गंगावणे, सुनिल कांबळे, बापु कुलकर्णी, महेश बोरकर, ॲड. बिपीन वारे, वसीम खान, जिलानी शेख, समीर पठाण, कदिर पठाण, बाळु बळे, कांतीलाल कवादे,  बाळु सुर्वे, काका रायकर आदी या आंदोलनात सामील झाले होते.

शिवसेनेने निवडणुकीत तब्बल ३०० युनिट पर्यंतचे वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. १०० युनिटपर्यंत माफी विषयी उर्जा मंत्री बोलत होते. ते आश्वासन पाळलेलेच नाही. पण किमान या संकट काळात तरी त्याची आठवण ठेवत सामान्य जनतेचे वीज बिल माफ करावे.

-संतोष नवलाखा, जिल्हा संयोजक, आदमी पार्टी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडelectricityवीजmahavitaranमहावितरण