शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

चाळीस लाखांच्या दंडाबाबत नगर अर्बन बँकेच्या अधिकाºयांचीही काही जबाबदारी आहे की नाही? -रफिक मुन्शी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:17 PM

अहमदनगर- कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाºयांचे, प्रशासनाचे असते. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होते की नाही, हे पाहणे प्रशासन, अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक यांचेही काम आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष, संचालकांप्रमाणेच त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल बँकेचे सभासद व माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी आपली भूमिका मांडली.

अहमदनगर- कोणतेही ठराव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होत असतात. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाºयांचे, प्रशासनाचे असते. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होते की नाही, हे पाहणे प्रशासन, अधिकारी, बँकेचे व्यवस्थापक यांचेही काम आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष, संचालकांप्रमाणेच त्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल बँकेचे सभासद व माजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी आपली भूमिका मांडली.नगर अर्बन बँकेच्या अनियमित कारभाराबाबत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने नगर अर्बन बँकेला ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र यामध्ये बँकेचे प्रशासक, माजी अध्यक्षांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे बँकेचे सभासद संभ्रमात आहेत. त्यामुळे एक सभासद या नात्याने माझी ही भूमिका मांडत असल्याचे मुन्शी म्हणाले.ते म्हणाले, मीही एक अधिकारी आहे. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आणि मी एक अधिकारी असे अनेकवेळा निर्णय घेण्याचे प्रसंग आले. सभापतींनी काहीही ठराव केले तरी ते नियमात बसतात की नाही, हे आम्ही आधी पाहत होतो. सभापती किंवा समितीने ठराव केले तरी ते चुकीचे आहेत की बरोबर याची पडताळणी करणे ही अधिकाºयांचीच जबाबदारी असते. त्याचप्रमाणे बँकेतही आहे.बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने जे काही ठराव केले, निर्णय घेतले, ते नियमात आहेत का हे पाहण्याची जबाबदारी अधिकारी, व्यवस्थापकांवर आहे. त्यावेळी तत्कालीन अधिकाºयांनी अध्यक्ष, संचालकांना या चुकीच्या निर्णयाबाबत सांगणे, विरोध करणे आवश्यक होते. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. आरबीआयच्या नियमांचे पालन करणे ही जबाबदारी प्रशासनाची देखील आहे. ४० लाख दंडाबाबत माजी अध्यक्ष, संचालक आणि प्रशासनाने आपली भूमिका मांडली नसल्याचे सभासद वर्ग संभ्रमात आहे. त्यामुळे माजी अध्यक्ष दिलीप गांधी यांनीही माध्यमांसमोर येऊन आपले म्हणणे मांडले पाहिजे. तसेच सध्याचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनीही ४० लाख दंडाबाबत भूमिका मांडली तर सभासदांमधील संभ्रम संपुष्टात येईल.