शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अहमदनगरमध्ये दररोज २० टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 3:49 AM

महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते.

अण्णा नवथर

अहमदनगर : महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते. तब्बल २० टक्केपाण्याची गळती होत असल्याने मध्यवर्ती शहरात दिवसाआड, तर उपनगरांत ३ ते ४ दिवसांनी पाणी दिले जात आहे.अहमदनगर शहराची लोकसंख्या साधारण ४ लाखांच्या घरात आहे. महापालिका जलसंपदा विभागाकडून दररोज ७५ एलडी पाणी घेते. प्रति माणशी १३० लिटर पाणी मिळणे अपेक्षित असताना १०० लिटर मिळते. दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. धरण खाली आणि शहर वर, अशी स्थिती असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत अहमदनगर महापालिकेची पाणी योजना खर्चिक आहे. महापालिकेचे मुळानगर, विळद, नागापूर, वसंत टेकडी ही चार पाणी उपसा केंदे्र आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपांचे वीज बिल दरमहा २ कोटी रुपये येते. दुरुस्तीसाठी येणारा खर्च ४ लाखांच्या घरात आहे. पाणी योजनेचा खर्च मोठा असला तरी त्या तुलनेत पाणीपट्टी वसूल होत नाही. दरवर्षी होणारा तोटा जवळपास १५ कोटींच्या घरात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दुप्पट करण्याचा ठराव २०१७ मध्ये दिला होता; परंतु त्यास मंजुरी दिली नाही. सध्या महापालिका दीड हजार रुपये पाणीपट्टी आकारते. असे असले तरी पाणीपट्टीचे २० कोटी थकीत आहेत.

107 कोटीची अमृत पाणी योजना

२०१० मध्ये ११६ कोटींची शहर सुधारित पाणी योजना, तर २०१७ मध्ये १०७ कोटींची अमृत पाणी योजना मंजूर आहेत; पण त्या अर्धवट असल्याने कमी पुरवठा होतो. शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नगर शहरातील १९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे; परंतु जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे कुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत.

टॅग्स :environmentपर्यावरणWaterपाणीAhmednagarअहमदनगर