शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

दोन पावसातच कुकडी आवर्तनाचा  विस्तव थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 11:19 AM

श्रीगोंदा- कुकडीचे आवर्तन कधी सुटणार आणि शेतीला मिळणार का? यावर चांगलेच रान पेटले होते पण श्रीगोंदा  कर्जत पारनेर तालुक्यात दोन पावसाने जोरदार सलामी दिली आणि कुकडीच्या आवर्तनाचा पेटलेला विस्तव थंडावला आहे.

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा- कुकडीचे आवर्तन कधी सुटणार आणि शेतीला मिळणार का? यावर चांगलेच रान पेटले होते पण श्रीगोंदा  कर्जत पारनेर तालुक्यात दोन पावसाने जोरदार सलामी दिली आणि कुकडीच्या आवर्तनाचा पेटलेला विस्तव थंडावला आहे.

 कुकडीचे आवर्तन दि २५ मे सोडणे आवश्यक होते पण डिंबे माणिकडोह चे पाणी येडगाव मध्ये न सोडल्याने कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडले आणि कुकडीचा लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले माजी मंत्री बबनराव पाचपुते प्रा राम शिंदे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. दरम्यान काळात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटले नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी लेखी पत्र दिले. अधिक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांनी  ६जुनला कुकडी आवर्तनाचा मुहूर्त काढला. 

-----------------------

पाणी सुटले तरी सर्व तलावत आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची शाश्वती नव्हती. अशा त्यामुळे शेतकरी अस्वस्थच होते. १ जुनलाच पावसाने मेघगर्जना करीत सलामी दिली. दोन जुनला रात्री दुसरी फेरी मारली सारी रान अबादानी झाली. घोड लाभक्षेत्र मांडवगण परिसराला दिलासा मिळाला. 

आता कुकडीचे आवर्तन कधी सुटणार आणि कशाला देणार यावर चर्चा बंद झाली आहे. शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी सुरु केली आहे.

---

  डिंबे माणिकडोह बोगद्याची  भिस्त ठाकरे  सरकारवर 

पावसामुळे कुकडीच्या आवर्तनाचा तात्पुरता विषय संपला आहे मात्र आगामी काळात कुकडीचे पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडावयाचा असेल तर डिंबे माणिकडोह बोगदा कुकडी कालव्याचे टेलकडील लाईनिंग कालव्यावरील उपसा सिंचन योजना व हूस पाईपावर आचारसंहिता लागू करणे महत्त्वाचे राहणार आहेत 

 डिंबे - माणिकडोह बोगद्याला देवेंद्र फडणवीस सरकार प्रशासकीय मान्यता देऊन हिरवा कंदील दाखवला आहे  यामध्ये माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे पण आता  उध्दव ठाकरे यांचे सरकार हे काम कधी हाती घेणार हाच खरा प्रश्न आहे  जर हे काम ठाकरे सरकारने हाती घेतली नाही तर यांची किमंत सत्ताधारी गटाला कर्जत करमाळा पारनेर श्रीगोंदा  विधानसभा मतदार  मोजावी लागणार हे निश्चित आहे 

--------------------

श्रीगोंद्यात सरासरी ५८ मिलिमीटर पाऊस 

 श्रीगोंदा तालुक्यात तीन जुन अखेर   सरासरी ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली सर्वाधिक पाऊस बेलवंडी मध्ये ९२ मिलिमीटर तर सर्वात कमी पेडगाव मध्ये २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मांडवगण परिसरातील ८८ मिलिमीटर   श्रीगोंदा ५१   काष्टी  ७०  चिंभळे 51 देवदैठण 47  तर कोळगाव परिसरात 48 मिलिमीटर पाऊस पडला आहे  यंदा पावसाची सुरुवात चांगली झाली आहे त्यामुळे पेरणीला वेग येणार आहे.