शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

४० वर्षानंतर मढीत पोहोचले वांबोरी चारीचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 5:06 PM

अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. 

मढी : अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी शेतकºयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुष्काळी पश्चिम भागाला मुळा धरणातून चारीद्वारे पाणी मिळावे म्हणून गेल्या ४० वर्षापासून या भागात मोठी आंदोलने झाली. अनेकांना तुरुंगवास झाला. शासनाने याची दखल घेवून मुळा चारीचे रूपांतर बंद पाईपद्वारे या भागाला पाणी देण्यासाठी पाईप योजना केली. योजना पूर्ण होवून १० वर्ष झाली. मात्र या योजनेला ठेकेदाराने केलेले अपूर्ण काम, योजनेतील त्रुटी, अनाधिकृत कनेक्शन्स यामुळे पाणी आले नाही. मध्यंतरी योजनेच्या ट्रायलच्या दरम्यान एकदा मढी येथे पाणी पोहोचले होते मात्र ते तत्काळ बंद करण्यात आले होते. सलग दोन वर्ष या भागात दुष्काळ पडला. या प्रश्नावर दै. ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच या भागात जनजागृती झाली. पुन्हा वांबोरी चारीचे आंदोलन पेटले. प्रशासन व राज्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या अथक परिश्रमामुळे या योजनेच्या ‘टेल’ला असणाºया मढी गावच्या तलावात पाणी नेण्यात यश आले.मढी, घाटसिरस या भागातील फळबागा दुष्काळामुळे जळाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे संकट वाड्यावस्त्यांवर जाणवत असताना वांबोरी चारीच्या पाण्याने या भागातील शेतकºयांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ‘टेल’ला पाणी आल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे शेतकरी भगवान मरकड, बबन मरकड यांनी सांगितले.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाAhmednagarअहमदनगर