शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

पावसामुळे जिल्ह्यात ४७५ कोटींचे नुकसान; मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 4:36 PM

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतकºयांना याचा फटका बसला आहे.

अहमदनगर : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. १५८३ गावांतील सुमारे ६ लाख ३६ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क््यांपेक्षा जास्त आहे. जिरायत, बायागत पिकांसह फळपिकांचा यात समावेश आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडूंब भरली असून शेतक-यांच्या शेतातील पाणी पंधरा दिवसांपासून साचल्याने सर्वच खरीप व काही रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिके व फळपिकांच्या नुकसानीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.  कृषी विभाग व महसूल विभागाने गेल्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले. एकूण ४ लाख ५४ हजार १२ हेक्टरवरील पिकांचे सुमारे ४७५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात २१ लाख ६५ हजार हेक्टर जिरायत, २२ लाख ११ हजार हेक्टर बागायत, तसेच १६ हजार २२६  हेक्टरवर फळपिक क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक फटका पाथर्डी (६१ हजार ७८१ हेक्टर) व शेवगावमध्ये (५९ हजार ७०५) बसला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा कृषी कार्यालयाच्या सहीनंतर ४७५ कोटी रूपये नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त व तेथून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. नवीन सरकार केव्हा स्थापन होईल, हे निश्चित नाही. अशा स्थितीत शेतक-यांना ही नुकसान भरपाई कधी मिळते, याकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार नुकसानीचा आढावा (तालुका-शेतकरी संख्या-क्षेत्र)नगर-३४९२२-२१७३१, पारनेर-४०९२४-२२२१६, पाथर्डी -८३३३५-६१७८१, कर्जत-३६१४०-२६७५३, श्रीगोंदा-४७३७० -३१६४८, जामखेड-१११२४-५२१५, श्रीरामपूर-३१८०६-२९४७२, राहुरी -४२३९४-३०९८२, नेवासा-५६१०३ -४५२२२, शेवगाव ७३७७८-५९७०५, संगमनेर-६०३१६-३७१९८, अकोले-५९०५५-२८३९९, कोपरगाव-४००२२ -३२३२६,राहाता-१८७७७ -२१३५८. असे एकूण ६३६१४६ शेतक-यांच्या ४५४०१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी