शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

महिला, शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

शेवगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

शेवगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा पती, सासरे व सासू यांच्याविरूद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रामपूर (ता. श्रीरामपूर) येथील श्रीरंग नाथू उफाळकर यांची मुलगी रोहिणी (वय १९) हिचा चार महिन्यांपूर्वी १७ एप्रिल २०१६ रोजी दहीगावने (ता. शेवगाव) येथील रोहिदास भानुदास गुंजाळ याच्याशी विवाह झाला. माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन तिचा सासरी वेळोवेळी छळ होत असल्याची माहिती तिने आपल्या वडिलांना दिली होती. ३ दिवसांपूर्वी माहेरच्या मंडळींनी तिला दहिगाव-ने येथे सासरी आणून सोडले. तेव्हा पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको, असा दम तिला पती, सासू, सासऱ्यांनी भरला. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने जाळून घेतले. यात तिचा मृत्यू झाल्याने तिच्या वडिलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मयत रोहिणीचा पती रोहिदास, सासरा भानुदास नरसू गुंजाळ, सासू सुशिला भानुदास गुंजाळ (सर्व रा. गुंजाळ वस्ती, दहीगाव ने) यांच्याविरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय राऊत तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असलातरी अद्याप कुणालाही अटक नाही. (तालुका प्रतिनिधी)\मांजरी : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील शेतकरी सहादु भाऊसाहेब शेरकर (वय ४१) यांनी कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविली़ डाळिंबाची बाग दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़सहादू शेरकर यांनी कडक उन्हाळयात टँकरव्दारे डाळिंबाला पाणी घालवून बाग वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाने पिच्छा पुरविल्याने गणित कोलमडले़ डाळिंब शेतीसाठी साडेतीन लाख रूपये खर्च के ला़ मात्र डाळिंबाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने शेरकर यांनी मृत्युचा मार्ग स्वीकारला़ शेरकर यांनी एका सहकारी सोसायटीकडून एक लाख तर औषधासाठी सव्वालाख रूपये कर्ज घेतले होते़ डाळिंबावर कर्ज फे डण्याचे नियोजन होते़ मात्र कर्ज फिटणे शक्य नसल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेणे पसंत केले़ मयत सहादु शेरकर यांच्या मुलीचा पुढील महिन्यात विवाह होणार असताना अचानक घडलेल्या घटनेने मुसळवाडी परिसरात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे़ शेरकर यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे़