शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

महिला, शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

शेवगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला.

शेवगाव : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून नवविवाहितेने जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा पती, सासरे व सासू यांच्याविरूद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रामपूर (ता. श्रीरामपूर) येथील श्रीरंग नाथू उफाळकर यांची मुलगी रोहिणी (वय १९) हिचा चार महिन्यांपूर्वी १७ एप्रिल २०१६ रोजी दहीगावने (ता. शेवगाव) येथील रोहिदास भानुदास गुंजाळ याच्याशी विवाह झाला. माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन तिचा सासरी वेळोवेळी छळ होत असल्याची माहिती तिने आपल्या वडिलांना दिली होती. ३ दिवसांपूर्वी माहेरच्या मंडळींनी तिला दहिगाव-ने येथे सासरी आणून सोडले. तेव्हा पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको, असा दम तिला पती, सासू, सासऱ्यांनी भरला. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने जाळून घेतले. यात तिचा मृत्यू झाल्याने तिच्या वडिलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मयत रोहिणीचा पती रोहिदास, सासरा भानुदास नरसू गुंजाळ, सासू सुशिला भानुदास गुंजाळ (सर्व रा. गुंजाळ वस्ती, दहीगाव ने) यांच्याविरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय राऊत तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असलातरी अद्याप कुणालाही अटक नाही. (तालुका प्रतिनिधी)\मांजरी : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील शेतकरी सहादु भाऊसाहेब शेरकर (वय ४१) यांनी कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविली़ डाळिंबाची बाग दुष्काळाने उद्ध्वस्त झाल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़सहादू शेरकर यांनी कडक उन्हाळयात टँकरव्दारे डाळिंबाला पाणी घालवून बाग वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाने पिच्छा पुरविल्याने गणित कोलमडले़ डाळिंब शेतीसाठी साडेतीन लाख रूपये खर्च के ला़ मात्र डाळिंबाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने शेरकर यांनी मृत्युचा मार्ग स्वीकारला़ शेरकर यांनी एका सहकारी सोसायटीकडून एक लाख तर औषधासाठी सव्वालाख रूपये कर्ज घेतले होते़ डाळिंबावर कर्ज फे डण्याचे नियोजन होते़ मात्र कर्ज फिटणे शक्य नसल्याने शेरकर यांनी विषारी औषध घेणे पसंत केले़ मयत सहादु शेरकर यांच्या मुलीचा पुढील महिन्यात विवाह होणार असताना अचानक घडलेल्या घटनेने मुसळवाडी परिसरात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे़ शेरकर यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे़