शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांची सखोल चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST

अहमदनगर : सन १९५२ पासून दोन लाख कोटी रुपये खर्च होऊनही अद्याप महाराष्ट्राला पिण्यासाठी मुबलक पाणी आणि शेतीसाठी पुरेशा ...

अहमदनगर : सन १९५२ पासून दोन लाख कोटी रुपये खर्च होऊनही अद्याप महाराष्ट्राला पिण्यासाठी मुबलक पाणी आणि शेतीसाठी पुरेशा प्रमाणात जलसिंचन न झाल्याने कृषी खात्याच्या मृद व जलसंधारणाच्या सर्व योजनांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.१९५२ पूर्वी न होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कृषी खात्याची कामे सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यातून असा प्रश्न पडतो की कृषी खात्याची नेमकी उद्दिष्टे शेती आणि शेतकरी नावारूपाला आणण्याची होती की शेती आणि शेतकरी देशोधडीला लागण्याची होती. सन २०१६ पासून भारतीय जन संसदने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी जनतेसमोर करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी तथा जलयुक्त शिवार योजनेचे महाराष्ट्र राज्याचे चौकशी अधिकारी बिजयकुमार अहमदनगर येथे आले होते. भारतीय जनसंसदने त्यांना जलयुक्त शिवार योजनेमध्ये कागदोपत्री असणाऱ्या गडबडी पुराव्यानिशी सिद्ध करून दिल्या तसेच त्यांना थेट शेतामध्ये नेऊन जलयुक्त शिवार योजनेची कामे कशी शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत आणि कर रूपातून जमा होणारा पैसा वाया घालविणारी आहेत हे समक्ष दाखवून दिले.

सन १९९८ मध्ये कृषी खात्याने केलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांच्या तक्रारी आपण तत्कालीन जिल्हाधिकारी बिजयकुमार यांच्याकडे केल्या होत्या. चौकशीअंती सुमारे ११५ कृषी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याची आठवण भद्रे यांनी करून दिली आहे. अशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना, वसुंधरा पाणलोट, गतिमान पाणलोट, रोजगार हमी योजना व इतर सर्व योजनांची सखोल चौकशी झाल्यास यापेक्षाही जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची खात्री भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, वीर बहादूर प्रजापती, कैलास पठारे, अशोक ढगे, बबलू खोसला, तंत्रज्ञ नामदेव घुले, सुनील टाक व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी व्यक्त केली आहे.