शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

रुग्णांच्या जीवावर बेततोय साखर कारखान्यांचा वेळकाढूपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:22 IST

अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने साखर आयुक्त कार्यालयाने साखर ...

अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांशी बोलणी सुरू केली आहे. मात्र साखर कारखाने वेळकाढूपणा करत असून, त्यांचा हा वेळकाढूपणा सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर बेतत आहे, असे मत आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ व्यक्त करीत आहेत.

कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. संकट काळात साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारून रुग्णांना वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आर्जव सरकारने कारखान्यांना केली आहे. मात्र, संगमनेर, प्रवरा आणि काेळपेवाडी या सहकारी साखर कारखान्यांनी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करण्याबाबत कळवले आहे. मात्र, त्यांचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. तर उर्वरित कारखान्यांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सहकारी साखर कारखान्यांनी नफ्या-तोट्याचा विचार न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, कोरोनाच्या संकट काळात मात्र सहकारी साखर कारखाने हात आखडता घेताना दिसत आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने इथेनॉल प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन केले. पण, इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करणे खर्चिक आहे. तसेच ही पद्धत वेळखाऊ आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करणे हा पर्याय पुढे आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. या खर्चासाठी संचालक मंडळाची परवानगी लागेल. त्यासाठी संचालक मंडळांची बैठक घेऊन, बैठकीत काय ठरते, ते पाहू, अशी कारणे कारखाना व्यवस्थापनाकडून पुढे केले जात आहे.

हवेतून ऑक्सिजन करण्याचा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज १ टन २५० किलो लीटर ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील साखर कारखाने उभे करू शकतात. त्यासाठी इथेनॉलच्या प्रकल्पात बदल करण्याची गरज नाही. हा प्रकल्प पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने उभा करू शकतात, असे काहींचे म्हणणे आहे.

....

शरद पवारांच्या सूचनेलाही

राष्ट्रवादी नेत्यांकडून बगल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांनी कोरोनाच्या संकट काळात मदत करावी. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजनचे प्रकल्प उभे करावेत, अशी सूचना पवार यांनी केली होती. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. परंतु, या कारखान्यांनीही पवार यांच्या सूचनेला सोयीस्करित्या बगल दिल्याचे यावरून दिसते.