शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

गावाने दु:ख केले हलके

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आई देऊबाई, वडील रभाजी, पत्नी सोनाली, सिया व समीक्षा या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या. निर्मलग्राम वडगाव आमलीने हे दु:ख एका कुटुंबाचे न मानता अख्ख्या गावाचे मानून हे दु:ख हलके केले.कोरडेपणाने निव्वळ प्रतिमेला फुले वाहून, श्रद्धांजली वाहून गावकरी थांबले नाहीत. त्यांनी मृत शेतकरी विलासच्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणासाठी उत्स्फूर्तपणे सुमारे १ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. हागणदारीमुक्त गाव व निर्मलग्रामचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेल्या वडगाव आमली (ता. पारनेर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रभाजी पटेकर यांचा विलास हा एकुलता एक मुलगा. कांद्याची लागवड करताना छातीत दुखू लागले. कामामुळे चमक भरली असेल म्हणून दोघे नवरा- बायको भाळवणीला दवाखान्यात निघाले. मध्येच एक मोटारसायकलस्वार भेटला. त्याने या दोघांना दवाखान्यात पोहोचविले. डॉक्टरांनी तपासले. हृदयविकाराचा झटका असल्याने नगरला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका बोलावण्यापूर्वीच दुसरा झटका आला. अन् संपूर्ण पटेकर कुटुंबालाच विलासने अखेरचा झटका देत जगाचा निरोप घेतला. आई आजारी बहिणीला भेटायला मुंबईला गेली होती. त्यांच्यासह दूरवरच्या नातलगांना निरोप गेले. मुंबईवाले येता येता पहाटेचे ३ वाजले. आई, बहीण पहाटे ३.३० वाजता पोहोचले. पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत पाहुणे वाट पाहत होते. कोणी शेकोटीचा आधार घेत होते. कोणी सोबतच्या पांघरुणात ऊब शोधत होते. पहाटे ४ च्या सुमारास विलासवर अंत्यसंस्कार झाले. नंतर जलदान विधी (दशक्रिया) झाला. हनुमान मंदिरात अख्खा गाव जमला होता. कार्यक्रमाचं नियोजन सारं गावानेच हाती घेतलं होतं. पटेकर गुरूजींना न सांगता गावानेच अन्नदानाची सोय केली होती. श्रद्धांजलीची भाषणं सुरू झाली. गावातल्या एका ज्येष्ठाने कल्पना मांडली. उपस्थितांनी आपापल्या परीने पटेकर कुटुंबाला नाही तर विलासच्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी. पाहता पाहता सुमारे १ लाख रुपयांचा निधी जमा झाला. गावातील ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, नोकरदार, शेतकरी, महिला अशा साऱ्यांनीच यात खारीचा सहभाग दिला. ही रक्कम विलासच्या सिया व समिक्षा या दोन मुलींच्या नावावर बँकेत एफ. डी. केली जाणार आहे. गावाने एका परिवाराचे दु:ख हलके करताना दु:खाच्या घटनेतूनही समाजासमोर आदर्श निर्माण केला. (प्रतिनिधी)