शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

विखेंनी रेमडेसिविरचे केलेले वाटप योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST

अहमदनगर : सध्या कोरोना रुग्णांना रेमडेसिविर, ऑक्सिजन तुटवडा अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना हजारो रुपये मोजून ...

अहमदनगर : सध्या कोरोना रुग्णांना रेमडेसिविर, ऑक्सिजन तुटवडा अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना हजारो रुपये मोजून इंजेक्शन खरेदी करावे लागत आहेत. अशा पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचे केलेले वाटप योग्यच आहे. या त्यांच्या समाजोपयोगी कामामुळे सर्वसामान्यांना दिलासाच मिळाला आहे. त्यामुळे यावरून राजकारण व्हायला नको, अशी अपेक्षा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली तसा रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचाही तुटवडा भासू लागला. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविरचा काळाबाजार होऊ लागला. अगदी चाळीस ते पन्नास हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले गेले. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळविण्यासाठी धडपडतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

अशा परिस्थितीत खासदार डॉ. सुजय विखे यांनी गेल्या आठवड्यात काही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध केले होते. त्याचे वाटपही त्यांनी केले. त्यानंतर ते इंजेक्शन कसे मिळविले याबाबतचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांना इंजेक्शन कसे मिळाले? त्यांनी नेमके कोणाला दिले? याबाबत चर्चा रंगली. त्यांच्या या धोरणावर काहींनी टीकाही केली.

याबाबत कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे त्या इंजेक्शनची मागणी अधिक आहे. मात्र, ते इंजेक्शन मिळत नाहीत. त्याअभावी रुग्णांना जीव गमावावा लागण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत डॉ. विखे यांनी काही प्रयत्न करून इंजेक्शन मिळविले असतील व सर्वसामान्यांना वाटप केले असतील तर ते त्यांनी योग्यच केले. त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. यावरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत यावरून राजकारण करणे योग्य ठरणार नाही, असेही कर्डिले म्हणाले.