शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:19 IST

सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी भाषण करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 

आगामी काळात आपल्यासमोर संघर्ष उभा राहिलेला आहे, येणाऱ्या निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष असते. २०२४ हा निवडणुकीचा काळ होणार आहे, या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज असल्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. आपला पक्ष फोडला, मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी शिबिर झाले तेव्हा अनेक दिग्गज या ठिकाणी समोर बसले होते. ते निघून गेल्यामुळे त्यावेळी मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसण्याची संधी मिळाली, असंही जयंत पाटील यांनी सांगितले. 

शरद पवारांनी हा पक्ष एका वैचारिक भावनेतून निर्माण केला, पण फार काळ सत्तेत राहिल्यामुळे विचारांकडे दुर्लक्ष झालं आणि सत्यकडे आपले लक्ष जास्त गेले. सत्तेत असताना विचारांवर जोर दिला पाहिजे ही भावना आमच्या मनात कमी प्रमाणात शिवली, त्यामुळे विचार काय आहेत? हा विचार न घेता काही लोक दुसऱ्या विचारांकडे आमच्या पक्षातून गेली. पण आपण सगळे पवार साहेबांना साथ देत ठामपणे आज या ठिकाणी काम करत आहोत. आपले काम इतरांपेक्षा सोपे आहे आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही. आपण सत्तेत बसणाऱ्यांच्या चुका काय आहेत? देशातील महागाई, बेकारी व ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्यावर लक्ष केंद्रित करून लोकांना त्याची समज देण्याचे काम आपण जर केलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर मांडल्या तर जनता सुज्ञ आहे. जनता आपला निर्णय घेत असते आपण मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने काम केले पाहिजे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केले. 

आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले-

आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले, अनिल देशमुखसारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली. नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आले? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना या प्रसंगातून जात असताना शरद पवारांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मांडतो. शरद पवारांनी तर उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली, ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली. या सर्व महापुरुषांचे आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौकट आखली. या सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

डॉ. अमोल कोल्हे डरने की बात नहीं-

आपण सगळ्यांनी या विचारांची आणि मुद्द्यांची नोंद करा. समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड असल्यामुळे आपण बोलण्यात कमी पडतोय, व आपण बोललेलं कुठे दाखवले जात नाही. आपला समज असतो की कोणी ऐकत नाही पण लोक सर्व ऐकत असतात. आपण ज्या विचारासाठी काम करतोय त्याला महत्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी घेऊन आपण या दोन दिवसात या ठिकाणाहून जाऊ, याची मला खात्री आहे. निवडणुका जवळ येत असताना आपण घराघरात राष्ट्रवादी हा प्रयत्न सुरू केला, कार्यकर्त्यांनी हा विचार प्रामाणिकपणे घराघरापर्यंत पोहोचवला. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आपण काढला, डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात प्रचंड मोठा दौरा केला व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना पाडण्याचा विडा आता काहीजण उचलायला लागलेले आहेत, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉ. अमोल कोल्हे डरने की बात नहीं. हा संपूर्ण पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभा राहील, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र