शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
3
अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
4
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
5
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
6
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
7
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
8
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
9
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
10
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
11
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
12
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
13
'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
14
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
15
भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
16
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
17
Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
18
Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
19
‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले 
20
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
Daily Top 2Weekly Top 5

'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:19 IST

सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी भाषण करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 

आगामी काळात आपल्यासमोर संघर्ष उभा राहिलेला आहे, येणाऱ्या निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष असते. २०२४ हा निवडणुकीचा काळ होणार आहे, या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज असल्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. आपला पक्ष फोडला, मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी शिबिर झाले तेव्हा अनेक दिग्गज या ठिकाणी समोर बसले होते. ते निघून गेल्यामुळे त्यावेळी मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसण्याची संधी मिळाली, असंही जयंत पाटील यांनी सांगितले. 

शरद पवारांनी हा पक्ष एका वैचारिक भावनेतून निर्माण केला, पण फार काळ सत्तेत राहिल्यामुळे विचारांकडे दुर्लक्ष झालं आणि सत्यकडे आपले लक्ष जास्त गेले. सत्तेत असताना विचारांवर जोर दिला पाहिजे ही भावना आमच्या मनात कमी प्रमाणात शिवली, त्यामुळे विचार काय आहेत? हा विचार न घेता काही लोक दुसऱ्या विचारांकडे आमच्या पक्षातून गेली. पण आपण सगळे पवार साहेबांना साथ देत ठामपणे आज या ठिकाणी काम करत आहोत. आपले काम इतरांपेक्षा सोपे आहे आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही. आपण सत्तेत बसणाऱ्यांच्या चुका काय आहेत? देशातील महागाई, बेकारी व ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्यावर लक्ष केंद्रित करून लोकांना त्याची समज देण्याचे काम आपण जर केलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर मांडल्या तर जनता सुज्ञ आहे. जनता आपला निर्णय घेत असते आपण मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने काम केले पाहिजे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केले. 

आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले-

आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले, अनिल देशमुखसारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली. नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आले? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना या प्रसंगातून जात असताना शरद पवारांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मांडतो. शरद पवारांनी तर उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली, ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली. या सर्व महापुरुषांचे आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौकट आखली. या सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

डॉ. अमोल कोल्हे डरने की बात नहीं-

आपण सगळ्यांनी या विचारांची आणि मुद्द्यांची नोंद करा. समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड असल्यामुळे आपण बोलण्यात कमी पडतोय, व आपण बोललेलं कुठे दाखवले जात नाही. आपला समज असतो की कोणी ऐकत नाही पण लोक सर्व ऐकत असतात. आपण ज्या विचारासाठी काम करतोय त्याला महत्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी घेऊन आपण या दोन दिवसात या ठिकाणाहून जाऊ, याची मला खात्री आहे. निवडणुका जवळ येत असताना आपण घराघरात राष्ट्रवादी हा प्रयत्न सुरू केला, कार्यकर्त्यांनी हा विचार प्रामाणिकपणे घराघरापर्यंत पोहोचवला. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आपण काढला, डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात प्रचंड मोठा दौरा केला व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना पाडण्याचा विडा आता काहीजण उचलायला लागलेले आहेत, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉ. अमोल कोल्हे डरने की बात नहीं. हा संपूर्ण पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभा राहील, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र