शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST

अहमदनगर : उपसरपंचावरील अविश्वास ठरावाचा श्रीगोंदा तहसीलदारांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवला असल्याने तहसीलदारांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीगोंदा ...

अहमदनगर : उपसरपंचावरील अविश्वास ठरावाचा श्रीगोंदा तहसीलदारांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवला असल्याने तहसीलदारांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील उपसरपंच राजेंद्र अप्पासाहेब मोटे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोटे यांच्या बाजूने निर्णय देत तहसीलदारांचा निर्णय रद्द ठरविला. २०१७ ते २०२२ या कालावधीत पारगाव सुुद्रिक ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन अर्जदार मोटे हे सदस्य म्हणून निवडून आले. ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या १६ असून सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली, तर अर्जदार मोटे यांची निवड सदस्यांमधून उपसरपंचपदी झाली. पुढे राजकीय वैमनस्यातून इतर सदस्यांनी मोटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्यावर चर्चा करण्यासाठी तत्कालीन श्रीगोंदा तहसीलदारांनी ३ सप्टेंबर २०२० रोजी विशेष सभेचे आयोजन केले. सभेला १६ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या बाजूने ११ तर ठरावाच्या विरोधात २ सदस्यांनी मतदान केले. तहसीलदारांनी एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केला.

त्यावर उपसरपंच मोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. मोटे यांच्या बाजूने ॲड. योगेश गेरंगे यांनी बाजू मांडताना सांगितले की, सरपंचपद हे थेट जनतेतून निवडून आले असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सुधारित कलम ३५ (३)मध्ये एखाद्यावर अविश्वास आणायचा असेल तर सदस्यसंख्येच्या तीन चतुर्थांस बहुमत गरजेचे आहे. परंतु, श्रीगोंदा तहसीलदारांनी संबंधित ठराव चुकीच्या पद्धतीने दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केला. त्यामुळे तो रद्द व्हावा. हा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मोेटे यांचा अर्ज मंजूर करत त्यांच्यावरील पारित झालेला अविश्वास ठराव रद्दबातल ठरविला.

-----------

तहसीलदारांचे अज्ञान?

ग्रामपंचायत अधिनियमात अविश्वास ठरावावर निकाल देताना कलम ३५ (३) प्रमाणे सुधारणा केलेली आहे. त्या सुधारित नियमानुसार अविश्वास ठरावासाठी तीन चतुर्थांस बहुमत लागते. कायद्यात याची स्पष्ट तरतूद असतानाही तहसीलदारांनी संबंधित ठराव दोन तृतीयांश बहुमताने कसा मंजूर केला, हा प्रश्न या निकालाच्या निमित्ताने समोर आला आहे. यातून तहसीलदारांच्या अज्ञानावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे दिसते.