शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँक मयत सभासदांच्या कुटुंबांना देणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. या बँकेने शिक्षकांचे प्रपंच आणि ...

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. या बँकेने शिक्षकांचे प्रपंच आणि शिक्षकांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केलेले आहे. शिक्षक बँकेच्या योजनांचे अनुकरण राज्यात केले जाते. यावर्षी कोरोनामुळे मोठ्या संख्येने सभासद मृत्यूमुखी पडले. बँकेच्या कुटुंब आधार योजनेतून १० लाख तसेच मयत निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिवंगत सभासदांच्या वारसांना देण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी सांगितले.

शिक्षक बँकेतर्फे दिवंगत सभासदांच्या वारसांना कुटुंब आधार निधीतून दहा लाख रुपये व मयत सभासद कर्ज निवारण निधीतून पाच लाख रुपये अशी पंधरा लाखाची भरीव मदत केली जाते. हे दोन्ही निधी सभासदांनी निर्माण केलेले आहेत. यामध्ये बँकेची कोणतीही भूमिका नाही. बँक फक्त वसुली आणि वितरण मध्यस्थ म्हणून काम करते. कुटुंब आधार निधी दरमहा गोळा होतो व त्यातून दरमहा मदत दिली जाते. या निधीमध्ये कोणतीही रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे कुटुंब आधार निधीमध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी वार्षिक सभेत पोट नियम दुरुस्ती केली जाणार आहे. कर्ज निवारण निधीमधून सभासदांचे सर्व कर्ज माफ करून वारसांना पाच लाख रुपये मदत दिली जाते. एक एप्रिल रोजी या निधीमध्ये ३ कोटी ३० लाख रुपये शिल्लक होते, त्यातून आतापर्यंत २९ सभासदांचे ३ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे मागील तीन महिन्यांमध्ये बँकेचे ६० सभासद दिवंगत झाले आहेत. चालू आर्थिक वर्षातील आठ महिने अजून शिल्लक आहेत. दरवर्षी सरासरी १८ ते २० सभासद मृत्यूमुखी पडतात. मात्र कोरोना लाटेने ही संख्या तिप्पट झाली आहे. सर्वांचे कर्ज माफ करून पाच लाख रुपयांची मदत व कुटुंब आधाराची दहा लाख रुपयांची मदत देण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांची तर कर्ज माफीसाठी ४ कोटी रुपये असे एकूण १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या बँकेकडे सव्वातीन कोटी रुपये उपलब्ध आहेत. कमी पडणारा निधी सभासदांकडून उभारावा लागणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सभासदांशी विचारविनिमय सुरू असून सर्व सभासद निधी देण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत निर्णय घेऊन सभासदांच्या वारसांना मदत निश्चित दिली जाणार आहे. कोरोनामुळे कुटुंबातील कर्ती माणसं अचानकपणे निघून गेली आहेत. त्यांना मदत करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. किमान या प्रश्नात तरी कोणीही गलिच्छ राजकारण करू नये, असे आवाहनही राजकुमार साळवे यांनी केले आहे.