शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

टँकरअभावी ५ गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:37 IST

शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मळेगाव शे। आदी ५ गावात अपुऱ्या पावसावर बंद करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर

शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, मळेगाव शे। आदी ५ गावात अपुऱ्या पावसावर बंद करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या हालचाली नसल्याने ग्रामस्थांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपूर्ततेची पूर्तता करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे पुन्हा परत आलेले मागणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी वरील ५ गावांतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून होत आहे.भातकुडगाव मंडळात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रशासनाने मात्र टंचाई सुविधांची मुदत संपल्याने भातकुडगावसह परिसरात सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर १ जुलैपासून बंद केलेले आहेत. परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या संकटामुळे वरील पाच गावांतील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह शेवगाव- नेवासा हमरस्त्यावरील भातकुडगाव फाट्यावर दि. ४ जुलै रोजी तब्बल ३ तास रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून याबाबत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी यांनी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे जाहीर केले. मात्र, अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत. तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी कार्यालयाकडे त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकरचे प्रस्ताव सादर केले. मात्र अपूर्ततेच्या कारणामुळे परत आलेले प्रस्ताव आज सोमवारी पंचायत समितीच्या टंचाई विभागाने तहसील कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती ग्रामस्थांना सांगण्यात आली.भातकुडगाव परिसरात अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकावे लागते. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी भायगावच्या सरपंच मनिषा आढाव, भातकुडगावचे सरपंच बाजीराव जमधडे, उपसरपंच शंकर नारळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ साळवे, देवटाकळीचे श्रीराम खरड, बक्तरपूरचे भाऊसाहेब सामृत आदी कार्यकर्त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)