शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

विधानाचा विरोधकांकडून विपर्यास केल्याचा विखेंचा खुलासा; म्हणाले, 'आता राजीनामा मागण्याची फॅशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:55 IST

सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले वक्तव्य

Radhakrishna Vikhe Patil: शेतकरी कर्जमाफीबातत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. आपण ते विधान ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत बोलताना म्हटले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचे, नंतर ते माफ करून घ्यायचे आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचे, हे वर्षानुवर्षे सुरू आहे, असे विधान विखे पाटील यांनी माळशिरस येथे केल्याचे माध्यमांतून दाखवले जात आहे. यावर राज्यात प्रतिक्रिया उमटल्यानंतर विखे पाटील यांनी शनिवारी शिर्डीत यावर खुलासा केला.

आपल्या विधानाचा संदर्भ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास होऊ शकतो याचे मला खरेच आश्चर्य वाटते. मी हे वक्तव्य ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले होते. अनेकदा या निवडणुकांदरम्यान लोक केवळ निवडणुकीसाठी कर्ज घेतात; पण त्यातून कोणतीही उत्पादकता होत नाही. मग पुन्हा तेच कर्जबाजारी होतात आणि नंतर कर्जमाफीची मागणी केली जाते, असे मी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोललो होतो.

मी अनेक वर्षे सामाजिक जीवनात काम करतोय आणि बेताल वक्तव्य करणे माझ्या स्वभावात नाही. माझे मूळ विधान जर संपूर्ण दाखवले असते, तर गैरसमज निर्माण झाला नसता. विरोधकांनी माझ्या विधानाचा फक्त एक भाग उचलून प्रचार केला आणि त्यातून वाद निर्माण झाला. विरोधक कोणत्याही बाबीचे राजकारण करत आहेत.

राजीनामा मागण्याची फॅशन

पुणे येथील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागितला जात असल्याबाबत विचारले असता, विखे म्हणाले, विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा शिल्लक नाही. राजीनामा मागण्याची फॅशन सुरू झाली आहे.

'तो' व्यवहार नियमबाह्यच

 दरम्यान, पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणावरही विखे पाटील यांनी भाष्य केले. हे खरेदी प्रकरण माझ्याकडेही आले होते. महार वतनाच्या जमिनीवर आपण निर्णय करू शकत नाही. त्या त्या मंत्र्यांनी प्रस्ताव नाकारलेच होते. हा पूर्ण व्यवहारच नियमबाह्य आहे. सगळ्याच जमिनीबाबत चौकशी झाली पाहिजे. कारण अनेक अधिकार जिल्हाधिकारी पातळीवर होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे. करार रद्द करताना जे आवश्यक ते केले जाईल, असे विखे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vikhe clarifies statement distortion; says, 'Demanding resignation is now a fashion'.

Web Summary : Radhakrishna Vikhe Patil clarified his statement on farmer loan waivers was distorted, made during local elections. He criticized the trend of taking loans for electoral gains and then seeking waivers. He also commented on the Parth Pawar land issue, deeming it illegal.
टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलFarmerशेतकरी