शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी सुरू मात्र खबरदारी घेताय ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदनगर : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस अखेर रस्त्यावर धावू लागली आहे. नगर जिल्ह्यात एकूण ७०० बस ...

अहमदनगर : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस अखेर रस्त्यावर धावू लागली आहे. नगर जिल्ह्यात एकूण ७०० बस असून त्यापैकी १६० बस पहिल्या दिवशी धावल्या. एसटी बस सुरू झाली असली तरी प्रवाशांनी कोरोनासंदर्भात खबरदारी बाळगावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी सोमवारपासून पुन्हा धावू लागली असून प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र, अनेक प्रवासी जणू कोरोना संपलाय, अशा आविर्भावात प्रवास करताना आढळत आहेत. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण अकरा आगारात ७०० बस आहेत. त्यापैकी १६० बस पहिल्या दिवशी जिल्हा, तसेच जिल्ह्याबाहेर धावल्या. शंभर टक्के आसन क्षमतेने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आली आहे. आता बस सुरू झाल्या असल्या तरी मोजक्याच फेऱ्या होत आहेत. आगारातून बस बाहेर पडते त्यावेळी ती सॅनिटाइज केली जात आहे, तसेच प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाही. सामाजिक अंतर राखले जात आहे. वेळोवेळी बस सॅनिटाइज केली जात आहे. मात्र, तरीही प्रवाशांनी सॅनिटायझर जवळ बाळगणे व त्याचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव घालता येऊ शकतो. मात्र, प्रवास करत असताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले तर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढून बस फेऱ्या बंद करण्याची वेळ येऊ शकते. आगाराकडूनही वेळोवेळी सॅनिटायझेशन केले जात आहे, तसेच प्रवाशांनीही काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत चालक, वाहकही प्रवाशांचे प्रबोधन करत आहेत.

-------------

सर्वाधिक वाहतूक पुणे मार्गावर

सोमवारपासून नगर जिल्ह्यात बस सुरू झाल्या. गेले दोन महिने जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही बस बंद होत्या. बस सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पुणे मार्गावर सर्वाधिक बस धावल्या. त्यानंतर नाशिक, मुंबई, गेवराई अशा ठिकाणी बस पाठवण्यात आल्या होत्या.

---------------

बस होते वेळोवेळी सॅनिटाइज

आता बस सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळले जात आहेत. आगारातून बस बाहेर पडते त्यावेळी सॅनिटाइज करण्यात येत आहे, तसेच बस परत आल्यानंतरही सॅनिटाइज करत असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून मिळाली.

दोन महिन्यांत ४२ कोटींचा तोटा

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी महामंडळ मोठ्या अडचणीत सापडले आहे. मागील दोन महिने बस फेऱ्या बंद असल्यामुळे नगर जिल्ह्यात ११ आगारांचे मिळून तब्बल ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढतोय

काही बस फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद अजून हवा तेवढा नाही. गर्दी नको म्हणून अनेक लोक एसटीने प्रवास करणे टाळत आहेत. परिस्थिती पाहून हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत आहे.

बस सुरू झाली अन्‌ जिवात जीव आला

गेल्या दोन महिन्यांपासून बस बंद असल्याने चालकही कंटाळवाणे झाले होते; परंतु आता बस सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून महामंडळाचा तोटा काहीअंशी का होईना भरून निघेल.

- चालक, तारकपूर आगार

बस पुन्हा सुरू झाली असली तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. आम्ही त्याबाबत त्यांना प्रवृत्त करत आहोत. कोणत्याही प्रवाशाला विनामास्क बसमध्ये घेतले जात नाही.

- वाहक, श्रीरामपूर आगार

----------

एकूण कर्मचारी - ४०००

वाहक - १३०८

चालक - १२६७

सध्या कामावर वाहक - १५०

सध्या कामावर चालक - २००