शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

कधी पैशासाठी, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. कधी पैशासाठी, तर पुत्रप्राप्तीसाठी भानामती, बुवाबाजीचे प्रकार जिल्ह्यात सुरू असून, हे प्रकार रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. या समितीने जिल्ह्यातील अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत.

जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील चांदा येथील धनासाठी दिलेला बळी, मोहटादेवी येथे पुरविलेले सोने, शनी शिंगणापूर येथील सत्याग्रह ही प्रकरणे राज्यभर गाजली. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही अंधश्रद्धेचे भूत कायम असल्याचे वरील प्रकारांवरून समोर आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांकडे न जाता बुवा-बाबांकडे खेट्या घातल्या जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. नेवासा व शेवगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी असे प्रकार सुरू होते. अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. या कायद्यांची प्रशासकीय यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे भानामती, बुवाबाजीचे प्रकार सुरूच असून, ते रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

...

कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हवी

राज्यात २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करण्यात आला; परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागात बुवाबाजी, भानामतीचे प्रकार घडत असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

...............

बुवाबाजीची २० हून अधिक प्रकरणे

गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यात २० हून अधिक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. भानामती करून आजार बरे करण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू होते. ते रोखण्यात यश आले असून, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

.....

नेवासा तालुक्यातील चांदा येथे धनासाठी बळी देणे, मोहटादेवी येथे सोने पुरणे, देशात स्त्री-पुरुष समानता असताना शनी शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारणे, याविरोधात आवाज उठविला. त्यामुळे अंधश्रद्धेचे अनेक प्रकार थांबले आहेत. शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे जरुरीचे आहे.

-बाबा आरगडे, सल्लागार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

....

सूचना: डमी क्रमांक १०९१