शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

...तर, नगर शहर घेईल झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

अहमदनगर : शहराचा विस्तार वेगाने होतो आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी तांत्रिक ...

अहमदनगर : शहराचा विस्तार वेगाने होतो आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, अहमदनगर महापालिकेत तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता आहे. महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास नगर शहर झेप घेईल. हाच नगर शहराच्या विकासाचा मंत्र आहे, असे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त मायकलवार हे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा १६ मार्च २०२० रोजी पदभार स्वीकारला. तो काळ अत्यंत कठीण होता. कोविड-१९ नगर शहरात येऊन धडकला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान समोर होते. कोरोनाची परिस्थिती हातळताना इतर कामे करता आली नाहीत; पण गेल्या दहा महिन्यांत काम करताना वेळोवेळी जी उणीव भासली ती म्हणजे तांत्रिक मनुष्यबळ. तांत्रिक मनुष्यबळाअभावी अनेक अडचणी निर्माण होतात. कारभाराला गती द्यायची असेल, तर सर्वप्रथम तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करावे लागेल. एकच अधिकारी अनेक विभागांचा कारभार पाहतो आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढलेला आहे. कामे उरकत नाहीत. त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले, मायकलवार म्हणाले.

महापालिकेत पाणीपुरवठा, विद्युत, प्रकल्प, सामान्य प्रशासन, बांधकाम, अतिक्रमण, मुख्य लेखा परीक्षक, नगररचना, प्रसिद्धी, या विभागांत प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. बांधकाम विभागात तर संपूर्ण शहरासाठी दोनच अभियंते आहेत. नागिरकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे; परंतु अभियंत्यांअभावी तक्रारींचा निपटारा होत नाही. दैनंदिन कामं वेळेत पूर्ण हाेऊ शकत नाहीत. तांत्रिक मनुष्यबळच नसेल, तर नवीन प्रकल्प राबविणार कसे, असा प्रश्न आहे.

...

विभागप्रमुखांमध्ये समन्वय असावा

महापालिकेत बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगररचना, लेखा व वित्त हे महत्त्वाचे विभाग असतात. या विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक बुधवारी विभागप्रमुखांची समन्वय बैठक घेतली. त्यामुळे अडचणींवर सखोल चर्चा होऊन प्रश्न मार्गी लागले. समन्वय नसल्याने आधी रस्ता करायचा आणि नंतर तोच रस्ता पाइपलाइन टाकण्यासाठी खोदायचा, असा प्रकार इथे सुरू होता. तो बंद केला. समन्वय बैठक या पुढील काळात सुरूच ठेवावी, जेणेकरून कारभाराला गती येईल, असे आयुक्त मायकलवार यांनी आवर्जून सांगितले.

..