शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश शासन देणार की शाळेने घ्यायचा?  मुख्याध्यापक संभ्रमात

By चंद्रकांत शेळके | Updated: May 29, 2023 20:52 IST

गणवेशाबाबत अजूनही गोंधळच

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश दिला जातो. या वर्षीही तो दिला जाणार आहे. मात्र या वर्षी तो शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करायचा की शासन खरेदी करून देणार याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये एकसमान एक रंगाचा गणवेश देण्याची घोषणा नुकतीच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. परंतु हा गणवेश शासन देणार की दरवर्षीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करायचा, याबाबत अद्याप अधिकृत सूचना शिक्षण विभागाला न आल्याने गणवेशाबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.

सध्याच्या धोरणानुसार पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना दोन गणवेशांचा लाभ देण्यात येतो. म्हणजे दोन गणवेशांचे पैसे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला दिले जातात. त्यातून समिती स्थानिक विक्रेत्यांकडून कोटेशन मागवून गणवेश खरेदी करते. परंतु आगामी शैक्षणिक वर्षापासून हे मोफत गणवेश दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती आणि दुसरा गणवेश राज्य सरकार देईल. या गणवेशासाठी राज्य सरकार शाळा व्यवस्थापन समितीला कापड उपलब्ध करून देईल. नंतर शाळा व्यवस्थापन समिती हे कापड महिला बचतगटांकडून किंवा स्थानिक पातळीवर शिवून घेतील. यासाठीचा खर्च राज्य सरकार समितीला देईल, अशी माहिती आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आलेली नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

काही ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश घेतलेले आहेत. त्यामुळे तीन दिवस शासनाचे गणवेष व तीन दिवस शाळेचे गणवेश घालावे, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. परंतु शासनाकडून हे गणवेश वेळेत मिळतील का? पंधरा दिवसांत शाळा उघडणार आहेत. त्यामुळे कापड कधी येणार, ते कधी शिवून घेणार, असा प्रश्न शाळांना पडला आहे.

दरवर्षी गणवेशांबाबत शासनाच्या सूचना येतात. त्याप्रमाणे सूचना आल्यानंतर शासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील. -भास्करराव पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबरोबर शालेय पोषण आहारदेखील शासनानेच शिजवलेला पुरवावा, असे सर्व शिक्षकांचे म्हणणे आहे. राज्यस्तरावरून गणवेश तसेच कापड पुरवठा करण्याचे प्रयोग यापूर्वीही झालेले आहेत, ते का अयशस्वी झाले हा प्रश्न शिल्लक राहतो. स्थानिक परिस्थिती, शालेय व्यवस्थापन समितीवर दाखवलेला अविश्वास, कपड्याचा रंग आणि दर्जाबाबत शंका उपस्थित होत असल्या तरी खरा प्रश्न शैक्षणिक वर्षाच्या अगदी तोंडावर नियोजन न करता घाईने घेतलेल्या निर्णयामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळेल का, हा आहे. वितरणाचा बट्ट्याबोळ होण्यापेक्षा या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर गणवेश घेऊन पुढील वर्षी शासन स्तरावरून गणवेश पुरवठा करण्याचे नियोजन करायला हरकत नाही. -प्रवीण ठुबे, शिक्षक नेते

टॅग्स :Schoolशाळा