शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तिला मायेची उब हवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 15:45 IST

महिला दिन आला की हे अधिकाधिक चढाओढीने सुरु होते. हल्ली तर हा दिवस एक इव्हेन्ट म्हणूनही साजरा केला जातो ! महिलांच्या प्रति आदर व्यक्त व्हावा आणि तिला तिच्या आत्मसन्मानाची जाणीव व्हावी म्हणून ठिक आहे. पण हे आठ मार्च पुरतेच न उरता उरलेले तीनशे चौसष्ट दिवसही सुरु राहिलं तर त्या उद्घोषणा आणि तो आदर सार्थकी लागेल.

महिला दिन विशेष/डॉ. सुचेता धामणे, महिला दिनानिमित्त अतिथी संपादक, लोकमत.महिला दिनाच्या निमित्ताने सगळीकडे महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सुरु असतात. महिला दिन आला की हे अधिकाधिक चढाओढीने सुरु होते. हल्ली तर हा दिवस एक इव्हेन्ट म्हणूनही साजरा केला जातो ! महिलांच्या प्रति आदर व्यक्त व्हावा आणि तिला तिच्या आत्मसन्मानाची जाणीव व्हावी म्हणून ठिक आहे. पण हे आठ मार्च पुरतेच न उरता उरलेले तीनशे चौसष्ट दिवसही सुरु राहिलं तर त्या उद्घोषणा आणि तो आदर सार्थकी लागेल. खरं तर समस्त महिलांच्या उध्दारास कारणीभूत ठरलेल्या सावित्रीबार्इंच्या त्यागाला आणि महिलेला माणूस म्हणून जगू देण्यासाठीच्या धडपडीला या दिवसाच्या निमित्ताने प्रणाम करणे गरजेचे आहे. समाजमनावर या माणूसपणाची छाप सोडणा-या मायेचे अनंत उपकार आहेत. आज स्त्री प्रतिष्ठेबद्दल आणि तिच्या विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीबद्दल अहमहिका लागल्यासारखे बोलले जाते. तिला आरक्षण दिले, तिला बरोबरीचा सन्मान दिला गेला वैगरे खूप .... पण तिच्या आरक्षणापेक्षाही तिला सुरक्षेची अधिकाधिक गरज पडू लागली. हे कशाचे द्योतक आहे ? ज्या समाजात महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या जातात त्याच समाजात दुसरीकडे आज इथली माय भगिनी कुठल्याच अर्थाने सुरक्षित नाही. अगदी एखाद्या तान्हुलीपासून तर नव्वदी पार केलेल्या आजीलाही इथल्या समाजाच्याच एका विकृत मनोवृत्तीकडून बलात्काराची शिकार होण्याची वेळ येते. कुणी त्यासाठी आमच्या आया बहिणींनाच जबाबदार धरून त्यांच्या पेहराव आणि वागण्याला नावे ठेवण्यात धन्यता मानतात. माऊलीच्या माध्यमातून रस्त्यावर जगणाºया मानसिक आणि शारीरिक संतुलन हरवलेल्या आया बहिणीसाठी काम करतांना हे पदोपदी जाणवते. ज्यांनी महिनोन महिने अंघोळ केलेली नसते,ज्यांच्या देहाचा घाणेरडा वास येत असतो, अंगावर कपडे नसतात, असले तरी फाटके, घाणेरडे असतात. त्या भगिनीही अनन्वित लैंगिक अत्याचारास बळी पडतात. इथे तर पेहराव आणि वागण्याचा काहीही सबंध नसतो. ज्या समाजात घरातील स्त्री सुरक्षित नाही तर अशा रस्त्यावर पोरके आयुष्य जगणाºया या आया बहिणीची काय अवस्था होत असेल, याची कल्पना न केलेली बरी ! मुळात इथली पुरुषी मानसिकता स्त्रीदेहाकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून बघणार असेल तर शेवटी हेच होणार. ही मानसिकता इथल्या व्यवस्थेत कधी बदलणार हा प्रश्न आहे. जो समाज स्वत:ला सुसंस्कृत म्हणवतो. जो समाज नवरात्रात आणि दिपावलीला स्त्री स्वरूपातील देवीची पूजा अर्चना करतो तोच समाज तिला उपभोग्य वस्तू मानून तिला माणूस म्हणूनही जगू देत नाही. त्या समाजाची उंची आणि खोली मोजण्याची गरज निर्माण झाली आहे.  संपन्न सुसंस्कृत समाजात नारीला मानाचे आणि आदराचे स्थान असते असे म्हणतात. असा समाज स्वत:ही बदलतो आणि त्या राष्ट्राचीही असामान्य प्रगती होते. कारण तिच्या घरातील असण्यातच घराचे घरपण सांधलेले असते. तिला फक्त मायेची उब आणि अथांग आकाश कवेत घेण्याचे बळ दिले आणि वास्तवात सन्मानाची वागणूक दिली तरी दरवर्षी नेमाने साज-या होणा-या महिला दिनाचे सार्थक होईल. ‘लोकमत’ने वेळोवेळी महिलांना आधार दिला व सन्मानही दिला. समाजाने महिलांप्रती आदर वाढविल्यास ती अधिक सक्षम होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWomen's Day Specialजागतिक महिला दिन