शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रतिष्ठेच्या लढतीत शंकरराव गडाखांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:47 IST

नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली.

नेवासा विधानसभा निवडणूक विश्लेषण - सुहास पठाडे । नेवासा : नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली.मुरकुटे-गडाख यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होईल असा अंदाज होता. मात्र सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची मोठी फळी, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग यांची मिळालेली साथ यामुळे गडाखांनी मुरकुटेंचा सहज पराभव केला.सतरा उमेदवार रिंगणात असूनही येथे सुरुवातीपासूनच गडाख-मुरकुटे यांच्यातच खरी लढत होती. गडाख यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्वीकारता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. येथे राष्टÑवादीने उमेदवार न देता गडाखांना पाठिंबा दिला. घुले बंधंूंनी त्यांची ताकद गडाख यांच्या पाठीशी उभी केली. त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतल्या. तालुक्यातील पाटपाण्याच्या कोलमडलेल्या नियोजनाचा मुद्दा गडाख यांनी प्रचारात प्रामुख्याने उचलला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात मोठी प्रचार यंत्रणा उभी केली. मोठ्या सभा घेण्याऐवजी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला होता. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रशांत गडाख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, उदयन गडाख यांनी गडाख यांच्या प्रचाराची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. प्रशांत गडाख यांनी सोशल मीडियावर विकासाच्या मुद्यावर केलेली ‘आमदार मुरकुटे उत्तर द्या’ ही ‘वेबसिरीज’ प्रभावी ठरली. २०१४ च्या निवडणुकीतील चूक सुधारण्यासाठी गडाख अगदी सुरुवातीपासूनच अलर्ट राहिले.मुरकुटे यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा वगळता भाजपच्या सर्व नेत्यांनी मुरकुटे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मुरकुटे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गटातच मुरकुटेंना मताधिक्य मिळवता आले नाही. या गटात गडाख यांनी मोठी प्रचार यंत्रणा राबविली. सोनई, खरवंडी, चांदा हे गट गडाखांचे बलस्थान आहेत. त्यात गडाखांनाच आघाडी मिळाली. पहिल्या फेरीपासूनच गडाख यांनी आघाडीत कायम राखत शेवटच्या फेरी अखेर ३० हजार ६६३ मतांनी विजय संपादन केला. 

माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. सर्वप्रथम जनतेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. गेल्या पाच वर्षात खूप त्रास झाला. मात्र ते सर्व विसरलो आहे. कार्यकर्त्यांनीही संकुचित वृत्ती न ठेवता मोठ्या मनाने झाले गेले विसरून जावे. मिळालेल्या संधीचा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फायदा घेणार आहे. माझ्या राजकीय जीवनातील ही अतिशय अटीतटीची निवडणूक होती. त्यात यश मिळाल्याने समाधानी आहे, असे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.     

टॅग्स :nevasa-acनेवासाShankarrao Gadakhशंकरराव गडाख