शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्याला बाद करण्याचा डाव

By admin | Updated: December 17, 2015 23:37 IST

संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही,

संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही, असे परखड मत पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या नियोजित ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संगमनेर महाविद्यालयात गुरूवारी ‘संत साहित्याचे समाज प्रबोधनातील योगदान’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रास प्रारंभ झाला. चर्चासत्राचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.सबनीस होते. संत साहित्य केवळ अध्यात्मिक साहित्य म्हणण्याचा प्रघात पडत चालला आहे. वास्तविक भौतिकवाद आणि प्रापंचिकतेसाठी संत साहित्य उपयुक्त आहे. संताची अध्यात्मिक व सामाजिक समता ही वैश्विक आहे. सामाजिक समतेसाठी संत साहित्य पूरक आहे. संत तुकारामांची समता आधुनिक समतेला पूरक असल्याचे सांगत डॉ.सबनीस यांनी तुकारामांच्या काही वचनांची उदाहरणे दिली. संत साहित्य श्रध्देचे साहित्य जरूर आहे. माणसातील विकृती दूर करण्यासाठी आणि निखळ माणूस बनण्यासाठी संत साहित्य गरजेचे आहे. संत साहित्य व समाज सुधारकांची परंपरा या दोन्हीमध्ये समतेचे सूत्र आहे. हे दोन्ही प्रवाह वेगळे नाहीत. या प्रवाहांना जोडण्यासाठी समतावादी संचित जरूरीचे आहे. त्यामुळे विद्वानांची विभागणी दोन टोकांच्या वर्तुळात नको. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक समन्वयक प्रा.डॉ.अशोक लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ खरात यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)