निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडले पाणी; चार दिवस चालणार आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 13:32 IST2020-12-04T13:31:25+5:302020-12-04T13:32:23+5:30
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार २०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली.

निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडले पाणी; चार दिवस चालणार आवर्तन
राजूर : भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांसाठी जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार २०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली.
प्रवरा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी साचलेल्या डबक्यांतील पाणी खराब झाले होते. अनेक ठिकाणी प्रवरा नदीपात्र कोरडेठाक पडले होते. असे असताना भंडारदरा-निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील गावांमधून होत होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार २०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली.
पिण्याच्या पाण्याचे हे आवर्तन अंदाजे चार दिवस चालणार असून यात ४०० ते ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होणार असल्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. आवर्तन सोडतेवेळी निळवंडे धरणातील पाणीसाठा ८ हजार २८५ दशलक्ष घनफूट इतका होता.