शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पुराने वेढलेल्या सरला बेटातून रामगिरी महाराज अखेर बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 18:56 IST

येवला येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी निघालेले सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज गोदावरीच्या पुराने वेढा दिल्याने बेटावरच अडकले.

श्रीरामपूर - येवला येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी निघालेले सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज गोदावरीच्या पुराने वेढा दिल्याने बेटावरच अडकले. महाराजांनी प्रशासनावर खापर फोडत आपल्याला बोटीतून उतरवून दिल्याने निषेध केला. अखेर स्वत:च्याच बोटीने धोकादायकरित्या प्रवास करीत पुराचा वेढा पार केला. सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रसंगामुळे महाराजांच्या भक्त परिवारातून संताप व्यक्त केला जात आहे. श्रीरामपूर व वैैजापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या येथील सराला बेट येथे हा प्रकार घडला. गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पावणे तीन लाख क्युसेक पाण्यामुळे बेटाला दोन्ही बाजूने पुराचा वेढा पडलेला आहे. त्यामुळे महंत रामगिरी हे भक्त परिवारासमवेत येथे रविवारपासूनच अडकलेले होते. त्यांनी प्रशासनावर सर्व खापर फोडले आहे.येवला तालुक्यातील तळवाडे येथे गंगागिरी महाराजांच्या १७२ वा अखंड हरिनाम सप्ताह सोमवारपासून सुरू झाला आहे. महाराजांचा नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात लाखोंचा भक्त संप्रदाय आहे. या सप्ताहाकरिता राज्यातून लाखो भाविक आले आहेत. मात्र पुरात अडकल्यामुळे सप्ताहाच्या उद्घाटनाला जाण्यास महाराजांना मोठा उशीर झाला. प्रशासनाने आपल्याला बोटीतून उतरविले. कवडीचीही मदत केली नाही. त्यामुळे सप्ताहाला लवकर जाता आले नाही. या प्रकाराचा मी निषेध करतो, तसेच अशी घटना पुन्हा घडू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया महंत रामगिरी यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या भक्तांनीही निषेध केला. मठाच्या स्वत:च्या बोटीतून भक्तांसमवेत धोकादायकरित्या पुराच्या पाण्यातून प्रवास करत महंत रामगिरी हे वैैजापूर तालुक्याच्या हद्दीत पोहोचले.  प्रशासनाने मात्र आरोप फेटाळलेतहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी महंत रामगिरी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. प्रांताधिकारी तेजस चव्हाण, नायब तहसीलदार जयश्री गुंजाळ, पोलीस निरीक्षक व महसूलच्या कर्मचाºयांसह आपण बेटावर जाऊन महाराजांना सुखरूप सुरक्षितस्थळी येण्याची विनंती केली होती. मात्र मठातील गायी व भक्त परिवाराला सोडून आपल्याला येता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.  त्यानंतरही आम्ही विनवणी केली. मात्र पुराचे पाणी वाढल्याने आमचा नाईलाज झाला. हा सर्व प्रकार जिल्हाधिकाºयांच्याही कानावर घातल्याचे ते म्हणाले.  महंत रामगिरी यांचे शिष्य मधू महाराज यांनी सोमवारी ऐनवेळी हेलिकॉप्टरची परवानगी मागितली होती. मात्र ऐनवेळी ती देणे शक्य नव्हते. जिल्हाधिकारी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार होते. मात्र तत्पूर्वीच महाराजांनी स्वत:च्या बोटीतून प्रवास सुरू केला. मी एनडीआरएफची टीम तातडीने रवाना केली. ही टीम महाराजांच्या बोटीसोबतच होती. ते सुखरूप बोटीतून बाहेर पडेपर्यंत मोबाईलवर संपर्कात होतो.-प्रशांत पाटील, तहसीलदार, श्रीरामपूर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस