शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट होताच राजकारण तापले

By admin | Updated: September 26, 2014 00:17 IST

अहमदनगर : पंधरा दिवसांपासून युती आणि आघाडीचा सुरू असलेला घोळ गुरूवारी संपला आहे.

अहमदनगर : पंधरा दिवसांपासून युती आणि आघाडीचा सुरू असलेला घोळ गुरूवारी संपला आहे. भाजपाच्या पत्रकार परिषदेने २५ वर्षापूर्वीची युती संपुष्टात आल्याची तर राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेने आघाडी संपुष्टात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. युती-आघाडीच्या फाटाफुटीचा निर्णय होताच जिल्ह्यातील राजकारण तापले असून उमेदवारीसाठी इच्छुकांची एकच धावपळ उडाली आहे. जागावाटपावरून आघाडी आणि युतीत ताणाताणी सुरू होती. आता तुटणार, नंतर तुटणार, पुन्हा समेट अशा बातम्या आठ दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, याच काळात युती आणि आघाडीतील चारही पक्षांनी जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघातून इच्छुकांची चाचपणी पूर्ण करून ठेवली होती. चारही पक्षांकडून युती आणि आघाडी संपुष्टात येण्याच्या घोषणेची वाट पाहिली जात होती. गुरूवारी सायंकाळी ही घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले. उमेदवारीसाठी अनेकांची धावपळ सुरू झाली. काही ठिकाणी उमेदवारांकडून पक्षाकडे तर काही ठिकाणी पक्षाकडून उमेदवारांना फोनाफोनी सुरू झाली आहे. जिल्ह्यात सेना,भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशी पंचरंगी लढती रंगणार आहेत. (प्रतिनिधी)मतदारसंघनिहाय पक्ष व उमेदवारनगर शहरातून सेनेचे अनिल राठोड, काँग्रेसचे सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप मैदानात आहेत. भाजपाकडून सुवेंद्र गांधी, गीतांजली काळे, अभय आगरकर यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो. वसंत लोढा मनसेतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.नेवासा तालुक्यातून राष्ट्रवादीकडून शंकरराव गडाख, मनसेकडून दिलीप मोटे मैदानात आहेत. भाजपाकडून बाळासाहेब मुरकुटे भाजपा, सेनेचे बाळासाहेब पवार आणि अरूण वाकचौरे काँग्रेस हे संभाव्य उमेदवार असू शकतात.शेवगाव-पाथर्डीत राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाकडून उमेदवाराचा शोध सुरु आहे. हर्षदा काकडे, सी.डी फकिर, मोनिका राजळे, अर्जुन शिरसाठ, काशिनाथ लवांडे यांची नावे चर्चेत आहेत. हेच चेहरे विविध पक्षांकडून रिंगणात असण्याची शक्यता आहे. ४पारनेरात शिवसेनेचे आ. विजय औटी यांना आव्हान देण्यासाठी भाजपाकडून विश्वनाथ कोरडे आणि रामदास भोसले यांच्यापैकी एकाच्या नावावर विचार करु शकते. काँग्रेसकडून राहुल झावरे, राष्ट्रवादीकडून काशिनाथ दाते, सुजित झावरे यांच्यासह अन्य इच्छुकांपैकी एकाचे नाव अंतिम होऊ शकते. मनसेकडून बाबासाहेब तांबे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अकोल्यातून शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यांचे नाव अंतिम झाल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादीकडून वैभव पिचड मैदानात आहेत. भाजपाकडून अशोक भांगरे मैदानात उतरु शकतात. मात्र काँग्रेस कोणाला संधी देणार, हा प्रश्न चर्चेचा असेल. श्रीगोंद्यातून सेनेकडून जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे लढतील, हे निश्चित आहे. भाजपाकडून बबनराव पाचपुते तर राष्ट्रवादीने राहुल जगताप यांचे नाव अंतिम केलेले आहे. आघाडीत पडलेल्या फुटीचा या ठिकाणी काय परिणाम होतो, हे लवकरच दिसणार आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघात आ.राम शिंदे यांच्यासमोर आता शिवसेनेकडून प्रा. मधुकर राळेभात, रमेश खाडे यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल. काँग्रेसकडून प्रवीण घुले, मीनाक्षी साळुंके, राजेंद्र निंबाळकर, अंबादास पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड यांच्यात स्पर्धा आहे. ४संगमनेरमध्ये काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना सेनेचे बाबासाहेब कुटे, भाजपाकडून साहेबराव नवले यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी याठीकाणी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. शिर्डीत काँग्रेसकडून मंत्री राधाकृष्ण विखे रिंगणात आहेत. सेनेकडून अभय शेळके, भाजपाकडून राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे हे पर्याय आहेत. राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार आहे. राहुरीत भाजपाकडून विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीकडून प्रसाद तनपुरे किंवा शिवाजी गाडे, काँग्रेसकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, तान्हाजी धसाळ आव्हान देताना दिसण्याची शक्यता आहे. कोपरगावातून सेनेकडून आशुतोष काळे, काँग्रेसकडून राजेश परजणे तर राष्ट्रवादी किंवा भाजपा यापैकी बिपीन कोल्हे कोणता पर्याय निवडतात हे लवकरच समोर येईल.श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आ. भाऊसाहेब कांबळे यांना संधी मिळाली आहे. सेनेकडून लहू कानडे, राष्ट्रवादीकडून हनुमंत डोळस मैदानात असतील. मात्र भाजपाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे असतील की आणखी कोणी, हे दोन दिवसात स्पष्ट होईल.