शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी दहा गावांना वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

कोपरगाव : राहाता तालुक्यातील चितळीसारख्या गावात एक महिन्याच्या कालावधीत मृत्यूचे अर्धशतक गाठलेले आहे. ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना ...

कोपरगाव : राहाता तालुक्यातील चितळीसारख्या गावात एक महिन्याच्या कालावधीत मृत्यूचे अर्धशतक गाठलेले आहे. ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच या भयंकर परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी काय करत आहेत, असा सवाल भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघातील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. दिवसागणिक वाढत असलेली रुग्णसंख्या ही अतिशय मोठी चिंतेची बाब असून मतदारसंघातील चितळीसारख्या गावातही अक्षरक्ष: कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करून घ्यावे. तसेच वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे होते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असताना जनजागृती तसेच प्राथमिक उपचार करून रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक होते. परंतु, योग्य ते नियोजन न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. दुर्देवाने चितळीकरांवर आलेल्या या महाभयंकर संकटात अनेक ज्येष्ठ, तरुण तसेच कुटुंबातील कर्त्या व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे. आतातरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.