शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

निळवंडेचे कालवे बंदिस्तच व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:49 IST

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे व्हावेत, या मागणीसाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसह आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.

अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे व्हावेत, या मागणीसाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसह आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.अकोले तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी अल्पभूधारक आहेत. सध्या कालवा जात असलेल्या जमिनी पूर्ण बागायती आहेत. त्यामुळे बागायती जमिनी वाया जाणार आहेत. शिवाय माती कालव्यातून पाणी वाहून नेल्यास ४० टक्के पाण्याचे बाष्पीभवन व पाझर होऊन नुकसान होणार आहे. कालव्यांचा देखभाल खर्चही खूप आहे. कालव्यांच्या आतील ७ हजार हेक्टर जमीन भविष्यात पाणथळ, दलदलीची क्षारपड होऊन नापीक होईल.त्यामुळे ६४ हजार हेक्टर क्षेत्र निळवंडेच्या पाण्यावर उघड्या कालव्यांनी बागायती करणे अशक्य होणार आहे. ही विशेष बाब लक्षात घेता माती कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे कालवे काळाची गरज आहे, अशी आग्रही मागणी पिचड यांच्यासह शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांसमोर मांडली. निळवंडे २ प्रकल्पाला मान्यता १९९२साली मिळाली, परंतु यासाठीचे भूसंपादन मात्र त्याआधीच सुरू झाले होते, या नियमबाह्य कृतीकडे पिचड यांनी जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले.आंदोलनाची खरी धार आता वाढत चालली आहे. त्यामुळे कोणीही नकारात्मक विचार करू नये, आपल्या मागण्या प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत. आता शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे व त्या दिशेने तयारी करणे गरजेचे आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. शासनाला बंदिस्त कालवे नेण्यास भाग पाडूच, असा विश्वास पिचड यांनी बैठकीनंतर बोलून दाखवला.यावेळी बाळासाहेब वाळुंज, भाऊसाहेब धुमाळ, देवीदास धुमाळ, बंडू हासे, शरद हासे, दौलत मालुंजकर, विनोद चौधरी, चंद्रभान देशमुख, बाळासाहेब घोडके, आत्माराम मोरे, सहादू आरोटे, खंडू वाकचौरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर