शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेचे कालवे बंदिस्तच व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:49 IST

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे व्हावेत, या मागणीसाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसह आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.

अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे व्हावेत, या मागणीसाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसह आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.अकोले तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकरी अल्पभूधारक आहेत. सध्या कालवा जात असलेल्या जमिनी पूर्ण बागायती आहेत. त्यामुळे बागायती जमिनी वाया जाणार आहेत. शिवाय माती कालव्यातून पाणी वाहून नेल्यास ४० टक्के पाण्याचे बाष्पीभवन व पाझर होऊन नुकसान होणार आहे. कालव्यांचा देखभाल खर्चही खूप आहे. कालव्यांच्या आतील ७ हजार हेक्टर जमीन भविष्यात पाणथळ, दलदलीची क्षारपड होऊन नापीक होईल.त्यामुळे ६४ हजार हेक्टर क्षेत्र निळवंडेच्या पाण्यावर उघड्या कालव्यांनी बागायती करणे अशक्य होणार आहे. ही विशेष बाब लक्षात घेता माती कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे कालवे काळाची गरज आहे, अशी आग्रही मागणी पिचड यांच्यासह शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांसमोर मांडली. निळवंडे २ प्रकल्पाला मान्यता १९९२साली मिळाली, परंतु यासाठीचे भूसंपादन मात्र त्याआधीच सुरू झाले होते, या नियमबाह्य कृतीकडे पिचड यांनी जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधले.आंदोलनाची खरी धार आता वाढत चालली आहे. त्यामुळे कोणीही नकारात्मक विचार करू नये, आपल्या मागण्या प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत. आता शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे व त्या दिशेने तयारी करणे गरजेचे आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. शासनाला बंदिस्त कालवे नेण्यास भाग पाडूच, असा विश्वास पिचड यांनी बैठकीनंतर बोलून दाखवला.यावेळी बाळासाहेब वाळुंज, भाऊसाहेब धुमाळ, देवीदास धुमाळ, बंडू हासे, शरद हासे, दौलत मालुंजकर, विनोद चौधरी, चंद्रभान देशमुख, बाळासाहेब घोडके, आत्माराम मोरे, सहादू आरोटे, खंडू वाकचौरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर