शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने चांगल्या संस्था बंद पाडल्या

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

राहाता : राज्यात विविध पातळीवर काम करताना, कायम जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पारदर्शक कारभार करता आला. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला हे मी सांगण्याची गरज नाही,

राहाता : राज्यात विविध पातळीवर काम करताना, कायम जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पारदर्शक कारभार करता आला. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला हे मी सांगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. चांगल्या संस्था बंद पाडण्याचे काम राष्ट्रवादीने केल्याचे त्यांनी सांगितले.शिर्डी मतदारसंघातील दाढ बुद्रुक येथे आयोजित केलेल्या विविध भागातील बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सुभाष गाडेकर, माजी उपसभापती प्रल्हाद बनसोडे, विखे पाटील कारखान्याचे संचालक देवीचंद तांबे, सरपंच रावसाहेब गाडेकर, उपसरपंच सुभाष तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, श्रावण वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपासोबत आहे. मंत्री म्हणून काम करताना मोठा संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादीने अनेक महत्त्वाचे खाते घेऊन त्यात भ्रष्टाचार केला. तसेच काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यासह आमदारांना त्रास देण्याची भूमिका घेतली. आज भ्रष्टाचार करणारेच स्वच्छ प्रशासनाची भाषा करतात. शिर्डी मतदारसंघ विकासकामामध्ये राज्यात पुढे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी यासह वैयक्तिक लाभार्थींच्या योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे मतदारसंघाची राज्यात चर्चा होते. आता हवा फक्त काँग्रेसचीच आहे, असा दावा विखे यांनी केला. मुळा-प्रवरा वीज संस्था बंद पाडण्याचे पाप कोणी केले, हे संस्थेच्या सभासदांसह मतदारांना चांगले माहीत आहे. चांगली संस्था बंद पाडण्यामध्ये विरोधकांचाही सहभाग मोठा होता. मुळा प्रवरेच्या कामगारांची चिंता तुम्ही करू नका, त्यासाठी मी समर्थ आहे. केवळ निवडणुकीच्या वेळी या कामगारांचा पुळका आपल्याला येतो. पाच वर्षे संस्था आणि कामगारांची आठवण आपल्याला झाली नाही का? प्रश्न कोणी सोडवला, हे कामगारांना माहीत असल्याने ते तुम्हाला थारा देणार नाहीत. सिंचन घोटाळा सर्वप्रथम आपण समोर आणला असे सांगतानाच आज जिल्ह्याचा पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. याविषयी बोलण्याचे धाडस कुणीही केले नाही. गावतील विविध विकास कामावर भाष्य करत दाढ बु. व दाढ खु. या नवीन पुलामुळे माणसं जोडण्याचे काम आपण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांवरती भर दिल्याने मतदारांमध्ये नवचैतन्य असून, ही निवडणूक खऱ्या अर्थाने मतदारांची हातात घेतली आहे. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा यानिमित्ताने घेत असल्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने हे मोठे फिलगुड मानले जाते. दाढ बुद्रुक येथे रावसाहेब रामभाऊ तांबे, संजय माकावणे, सावकार माकावणे आदींनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जनहिताच्या अनेक योजना काँग्रेसने आणल्या आहेत. त्याचे श्रेय आता मोदी सरकार घेत आहे. सर्वसामान्यांना आधार फक्त काँग्रेसच देऊ शकते. आज स्वतंत्र लढत असल्यामुळे राज्यात काँग्रेसचेच सरकार येईल असा आशावादही विखे यांनी व्यक्त केला. यावेळी देवीचंद तांबे, श्रावण वाघमारे, अ‍ॅड. भानुदास तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.