शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST

श्रीरामपूर : कोविडमुळे अनेक लोकांवर घरातच बसून राहण्याची वेळ आली. अगदी शेजारच्या घरी जाऊन संवाद साधणे बंद झाले. मित्र ...

श्रीरामपूर : कोविडमुळे अनेक लोकांवर घरातच बसून राहण्याची वेळ आली. अगदी शेजारच्या घरी जाऊन संवाद साधणे बंद झाले. मित्र परिवार व नातेवाईक दुरावले गेले. या सर्व गोष्टींचा परिणाम माणसांच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे.

लॉकडाऊन संपताच आता मानसिक स्वास्थ्य खराब झालेले लोक उपचार घेताना दिसून येत आहेत. संवाद हरपल्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा, व्यसनाधीनता अशा समस्या वाढल्या आहेत. मानसिक स्वास्थ्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एकमेकांशी संवाद साधून मन हलके होते. तसेच त्यातून आनंदही मिळत असतो. त्यामुळे जीवनामध्ये उत्साह कायम राहतो. मात्र मागील दीड वर्षांपासून कोविड संसर्गामुळे सर्वच जण घरामध्येच कोंडून राहिले आहेत. त्यामुळे संवाद कमी झाला आहे. नागरिकांच्या हालचाली कमी झाल्या व त्यातून शारीरिक व्याधीही जडल्या. संवादाअभावी एकटेपणा आला. नैराश्य, स्मृतिभ्रंश, चिंता वाढली. तरुणांमध्ये संवादाअभावी डिप्रेशन वाढले. शिवाय तरुण एकटेपणा दूर करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जात आहेत.

---------

मन हलके करणे हाच उपाय

कोविड काळात अनेकजण घरात राहिले. त्यामुळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, समाजाशी संवाद कमी झाला. त्यामुळे नैराश्य वाढले. संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मोबाइलवरून संवाद साधला जात आहे. मात्र प्रत्यक्ष भेटून केलेल्या संवादातून मन हलके होते. मोबाइलद्वारे ते होईलच असे नाही. मानसिक स्वास्थ्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. त्यातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

---------

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात...

एकमेकांशी संपर्क करण्याची माध्यमे सध्या वाढली असली तरी त्यातून विसंवादच जास्त होताना दिसून येत आहे. असुरक्षितता व त्याचबरोबर मला महत्त्व दिले जात नाही किंवा मीपणाची वृत्ती यामुळे विसंवाद निर्माण होतात. स्वतःचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी समाजाशी उत्तम प्रकारचा संवाद असणे महतत्त्वाचे आहे.

डॉ. संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख, बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर.

----------